शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

Ganga Dussehra 2022: महादेवांनी पृथ्वीला दोनदा वाचवले; त्याचे पुरावे आजही बघायला मिळतात; कुठे? सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 12:19 IST

Ganga Dussehra 2022: गंगेत स्नान करून आपण पावन होतो, परंतु याच गंगेच्या जलप्रपातामुळे येणार होते पृथ्वीवर भले मोठे संकट; काय आहे तिची कथा? जाणून घेऊ!

आपणासर्वांना माहीत आहे, त्रिदेवांनी आपापले कार्य विभागून घेतले आहे. ब्रह्मदेवांनी निर्मिती करावी, भगवान विष्णूंनी सृष्टीचे पालन पोषण करावे आणि देवाधिदेव महादेवांनी सृष्टीचे रक्षण करावे. हे तिन्ही देव आपले कार्य चोखपणे बजावत आहेत. याचाच प्रत्यय देणारी एक कथा गंगा दशहरा (९ जून) उत्सवाच्या निमित्ताने जाणून घेऊ. 

प्रभू रामचंद्र यांनी ज्या कुळात जन्म घेतला ते इक्ष्वाकु कुळ अनेक रथी महारथींनी जन्म घेऊन पावन केले होते. 'रघुकुल की रीत चली आई, प्राण जाई पर बचन ना जाई' हे त्यांचे ब्रीद होते. या कुळात राजा दिलीप यांचा सुपुत्र भगीरथ याने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळावी म्हणून तपश्चर्या केली. भगवान विष्णूंची आराधना केली. त्याच्या आधीच्या तीन पिढ्यांना जे शक्य झाले नाही, ते भगीरथाने साध्य केले. त्याच्या तपश्चर्येवर भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांना भगीरथाने आपला मनोदय सांगितला. 'देवा आमच्या कुळातील पूर्वजांना सद्गती मिळावी म्हणून स्वर्गलोकातील आकाशगंगा पृथ्वीवर अवतीर्ण करा. तिच्या पावन तीर्थाने माझ्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म करून मी माझे कर्तव्य पूर्ण करू इच्छितो!'

भगवान विष्णू तथास्तु म्हणाले. परंतु त्यांनी सांगितले, 'भगीरथा गंगेचा प्रपात एवढा आहे, की स्वर्गातून पृथ्वीवर येताना तिच्यामुळे प्रलय येऊन पृथ्वी वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर भगीरथ म्हणाला, 'देवा यावर तुम्हीच उपाय सांगा.'भगवान विष्णू म्हणाले, 'गंगेचा आवेग थोपवून धरण्याचे सामर्थ्य फक्त भगवान महादेवांकडे आहे. तू त्यांना विनंती कर. ते तुला नक्की मदत करतील.'

असे सांगून भगवान विष्णू अंतर्धान पावले. त्यांच्या सुचनेनुसार भगीरथाने महादेवाची उपासना सुरु केली. देवाधिदेव महादेव हे आशुतोष म्हणून ओळखले जातात. आशुतोष अर्थात लवकर प्रसन्न होणारे. भगीरथाने निर्मळ मनाने प्रार्थना करताच ते प्रसन्न झाले आणि त्यांनी भगीरथाचा मनोदय विचारला. भगीरथाने भगवान विष्णूंचा निरोप दिला. महादेवांनी होकार दिला. विष्णूंनी आपल्या पायाजवळ असलेल्या गंगेला पृथ्वीवर जाण्याचा आदेश दिला. विष्णूंच्या पायापासून दूर होण्याचे दुःख गंगामातेला सहन झाले नाही. परंतु देवाची आज्ञा म्हणून ती निघाली आणि महाभयंकर आवेगाने पृथ्वीच्या दिशेने कोसळू लागली. 

त्यावेळी महादेवांनी आपल्या जटा मोकळ्या केल्या आणि गंगेला आपल्या जटेत स्थान दिले. त्या जटांमध्ये गंगा अडकून गेली. तिला पृथ्वीवर प्रवाहित करण्यासाठी महादेवांनी आपल्या जटा शिळेवर जोरजोरात आपटल्या आणि गंगा प्रवाहित केली आणि आकाशगंगा पृथ्वीवर वाहू लागली. त्या तीर्थाने भगीरथाने आपल्या पूर्वजांने श्राद्धकर्म केले आणि त्यांना सद्गती प्राप्त झाली. भगवान शंकरांनी यापूर्वीही समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल प्राशन करून पृथ्वीचे संकट दूर केले व गंगोत्रीच्या उगमाच्या वेळेस तिला जटेत धारण करून पृथ्वीला प्रलयापासून वाचवले. ही गंगा ज्यादिवशी पृथ्वीवर अवतीर्ण झाली, तो दिवस आपण गंगा दशहरा म्हणून साजरा करतो. यंदा ९ जून रोजी हा उत्सव आहे. 

भगीरथाने महत्प्रयासाने गंगा भूतलावर आणली म्हणून तिला भागीरथी अशीही ओळख मिळाली व त्याच्यासारखे प्रयत्न करणाऱ्यांना 'भगीरथ प्रयत्न'अशी उपाधी मिळाली. भगवान शिव शंकरांनी ज्या ठिकाणी जटा शिळेवर आपटून गंगा मुक्त केली, त्या खुणा आजही उत्तरकाशी येथे गंगोत्री नामक तीर्थक्षेत्री बघायला मिळतात. त्याबद्दल सविस्तर माहिती पुढील लेखात.... 

Ganga Dussehra 2022: प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी गंगेचे मूळ अवश्य पहावे; वाचा गंगोत्रीच्या उगमाची रोचक माहिती!