शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
2
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
3
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
4
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
5
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
6
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
7
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
8
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
9
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
10
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
11
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
12
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
13
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
14
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
15
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
16
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
17
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
18
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
19
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
20
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या

वारंवार शुष्क पडणारे हात नैराश्याचे कारण तर नाही ना? वाचा हस्तरेषाशास्त्र काय सांगते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 14:39 IST

शारीरिक व्याधी लवकर बऱ्या होतीलही परंतु मानसिक व्याधींमधून बाहेर पडण्यासाठी स्वयंप्रेरणा महत्त्वाची असते. 

तळहाताच्या रेषा केवळ आपले भाग्य, व्यक्तिमत्त्व यांच्या निदर्शक नाहीत तर त्या आजारांबद्दलही भाकीत करतात. सद्यस्थितीत ६० टक्क्याहून अधिक लोक नैराश्यग्रस्त आहेत. पण हा एक प्रकारचा आजार आहे आणि तो वेळेवर उपचार केले असता बरा होऊ शकतो हे लोकांना पटत नाही. म्हणून ते चिकित्सा करायलाही घाबरतात. हस्तरेषाकार सांगतात, यासाठी तुम्ही स्वतःची चाचणी करून तळहाताची स्थिती, रेषा आणि खुणा यावरून स्वतःचे जुजबी परीक्षण करा. 

नैराश्याबद्दल कसे जाणून घेता येईल? 

सतत कंटाळा येणे, आळस येणे, झोपून राहावेसे वाटणे, कोणाशीही न पटणे, एकांतात, अंधारात राहावेसे वाटणे, वरचेवर रडू येणे, अतिसंवेदनशील होणे, शीघ्रकोपी होणे अशी नैराश्याची प्राथमिक लक्षणे सांगितली जातात. काही जणांसाठी ही स्थिती क्षणिक असते तर काही जणांसाठी दीर्घकालीन. यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. कारण शारीरिक व्याधी लवकर बऱ्या होतीलही परंतु मानसिक व्याधींमधून बाहेर पडण्यासाठी स्वयंप्रेरणा महत्त्वाची असते. 

या वैद्यकीय सूचनांबरोबर हस्तरेषेच्या अभ्यासाची जोड देऊया. हस्तशास्त्र ज्योतिष या संदर्भात काय सांगते पहा -

हातावरील प्रमुख रेषा वगळता अन्य रेषांमध्ये बदल होत राहतात. कधीकधी तळहातावर एखादे चिन्ह किंवा आकार तयार होतो आणि नंतर तो काही काळाने निघून जातो. या खुणा किंवा हे बदल आपल्याला आरोग्याशी निगडित सूचना देत असतात. त्या कशा ओळखायच्या ते पाहू-

- जर एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही तळव्याची त्वचा वारंवार कोरडी आणि खडबडीत होत  असेल आणि त्याच्या बोटांचा पुढचा भाग कोरडा व अंगठा समोरून काहीसा सपाट झाला असेल तर ती व्यक्ती नैराश्यात असल्याची चिन्हे आहेत. नैराश्यातून बाहेर आल्यावर तळहाताची त्वचाही मऊ होऊ लागते.

- ज्या व्यक्तीच्या हातात मस्तिष्क रेषा खालच्या दिशेने झुकलेली असते ती व्यक्तीही आयुष्याच्या काही टप्प्यावर नैराश्याची बळी ठरू शकते.

- तसेच मस्तिष्क रेषा झुकलेली आणि हृदयाच्या ओळीशी जोडली गेली असेल तर त्या व्यक्तीला मोठी मानसिक समस्या होऊ शकते. अशा व्यक्तीने वेळेवर उपचार घेणे आवश्यक आहे.

- मधल्या बोटाला जोडून तळहातावर असलेल्या उंचवट्यावर फुली असेल तर तेही नैराश्याचे लक्षण आहे. फुली जस जशी विरत जाते, तसा तणाव हलका होत जातो आणि व्यक्ती नैराश्यातून बाहेर येते. 

- ज्यांच्या हातावर रेषांची गुंतागुंत दिसते, असे हात अनेक समस्यांना सामोरे जाणार असल्याचे लक्षण आहे. याउलट ज्यांच्या तळ हातावरील रेषा स्पष्ट, ठळक आणि मोजक्या असतात असे हात भाग्यवान असतात आणि त्यांना तणावग्रस्त जीवनातून वेळेत बाहेर पडता येते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषMental Health Tipsमानसिक आरोग्य