शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

वारंवार शुष्क पडणारे हात नैराश्याचे कारण तर नाही ना? वाचा हस्तरेषाशास्त्र काय सांगते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 14:39 IST

शारीरिक व्याधी लवकर बऱ्या होतीलही परंतु मानसिक व्याधींमधून बाहेर पडण्यासाठी स्वयंप्रेरणा महत्त्वाची असते. 

तळहाताच्या रेषा केवळ आपले भाग्य, व्यक्तिमत्त्व यांच्या निदर्शक नाहीत तर त्या आजारांबद्दलही भाकीत करतात. सद्यस्थितीत ६० टक्क्याहून अधिक लोक नैराश्यग्रस्त आहेत. पण हा एक प्रकारचा आजार आहे आणि तो वेळेवर उपचार केले असता बरा होऊ शकतो हे लोकांना पटत नाही. म्हणून ते चिकित्सा करायलाही घाबरतात. हस्तरेषाकार सांगतात, यासाठी तुम्ही स्वतःची चाचणी करून तळहाताची स्थिती, रेषा आणि खुणा यावरून स्वतःचे जुजबी परीक्षण करा. 

नैराश्याबद्दल कसे जाणून घेता येईल? 

सतत कंटाळा येणे, आळस येणे, झोपून राहावेसे वाटणे, कोणाशीही न पटणे, एकांतात, अंधारात राहावेसे वाटणे, वरचेवर रडू येणे, अतिसंवेदनशील होणे, शीघ्रकोपी होणे अशी नैराश्याची प्राथमिक लक्षणे सांगितली जातात. काही जणांसाठी ही स्थिती क्षणिक असते तर काही जणांसाठी दीर्घकालीन. यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. कारण शारीरिक व्याधी लवकर बऱ्या होतीलही परंतु मानसिक व्याधींमधून बाहेर पडण्यासाठी स्वयंप्रेरणा महत्त्वाची असते. 

या वैद्यकीय सूचनांबरोबर हस्तरेषेच्या अभ्यासाची जोड देऊया. हस्तशास्त्र ज्योतिष या संदर्भात काय सांगते पहा -

हातावरील प्रमुख रेषा वगळता अन्य रेषांमध्ये बदल होत राहतात. कधीकधी तळहातावर एखादे चिन्ह किंवा आकार तयार होतो आणि नंतर तो काही काळाने निघून जातो. या खुणा किंवा हे बदल आपल्याला आरोग्याशी निगडित सूचना देत असतात. त्या कशा ओळखायच्या ते पाहू-

- जर एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही तळव्याची त्वचा वारंवार कोरडी आणि खडबडीत होत  असेल आणि त्याच्या बोटांचा पुढचा भाग कोरडा व अंगठा समोरून काहीसा सपाट झाला असेल तर ती व्यक्ती नैराश्यात असल्याची चिन्हे आहेत. नैराश्यातून बाहेर आल्यावर तळहाताची त्वचाही मऊ होऊ लागते.

- ज्या व्यक्तीच्या हातात मस्तिष्क रेषा खालच्या दिशेने झुकलेली असते ती व्यक्तीही आयुष्याच्या काही टप्प्यावर नैराश्याची बळी ठरू शकते.

- तसेच मस्तिष्क रेषा झुकलेली आणि हृदयाच्या ओळीशी जोडली गेली असेल तर त्या व्यक्तीला मोठी मानसिक समस्या होऊ शकते. अशा व्यक्तीने वेळेवर उपचार घेणे आवश्यक आहे.

- मधल्या बोटाला जोडून तळहातावर असलेल्या उंचवट्यावर फुली असेल तर तेही नैराश्याचे लक्षण आहे. फुली जस जशी विरत जाते, तसा तणाव हलका होत जातो आणि व्यक्ती नैराश्यातून बाहेर येते. 

- ज्यांच्या हातावर रेषांची गुंतागुंत दिसते, असे हात अनेक समस्यांना सामोरे जाणार असल्याचे लक्षण आहे. याउलट ज्यांच्या तळ हातावरील रेषा स्पष्ट, ठळक आणि मोजक्या असतात असे हात भाग्यवान असतात आणि त्यांना तणावग्रस्त जीवनातून वेळेत बाहेर पडता येते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषMental Health Tipsमानसिक आरोग्य