शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

भक्ताने सुरू केला ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 10:49 IST

कसल्याही परिस्थितीमध्ये माउलींच्या पादुका पंढरपूरला न्यायच्याच असा निश्चय करून त्यांनी वर्षभर जुळवाजुळव केली.

विविध  संतांच्या पालख्या या  त्यांच्या वंशजांनी सुरू ठेवल्या परंतु लहान वयातच समाधी घेतलेल्या संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा गुरू हैबतबाबा आरफळकर या  भक्ताने सुरू केला. नारायण महाराजानंतर त्यांच्या वंशजामध्ये भाऊबंदकी वाढली आणि १८३१ साली फक्त तुकाराम महाराजांच्याच पादुका पंढरपूरला नेल्या गेल्या. १८३१ माउलींच्या पादुका पंढरपूरला न गेल्याने माउलीभक्त असलेले गुरू हैबतबाबा यांना अतीव दु:ख झाले. सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकाराच्याकडे सरदार होते. पुढील वर्षी कसल्याही परिस्थितीमध्ये माउलींच्या पादुका पंढरपूरला न्यायच्याच असा निश्चय करून त्यांनी वर्षभर जुळवाजुळव केली. शिंदे सरकारांनी त्यासाठी मदत केली. अंकलीचे शितोळे सरकार यांनी घोडे व तंबूची सोय केली. खंडोजीबाबा भापकर आणि सुभानजी शेडगे यांच्यासह हैबतबाबांनी १८३२ साली ज्येष्ठ वद्य अष्टमीला संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरीची वारी सुरू केली. 

पाचशेवर दिंड्या

गुरु हैबतबाबांनी आळंदीकर आणि मल्लप्पा वासकर यांच्यासह पहिली दिंडी निर्माण केली. त्यानंतर दुसरी दिंडी खंडुजीबाबांची तर तिसरी दिंडी सुभानजी शेडगे यांची असा क्रम लावला. कालांतराने पादुका रथामधून नेल्या जाऊ लागल्या. ‘ज्ञानियाचा राजा ’ दिमाखात पंढरपूरला जाऊ लागला. त्यासाठी चौरीवाले, अबदागिरी, भालदार, चोपदार, सनई, चौघडा, शिंगवाले, भोई असे विविध मानकरीसुध्दा तयार झाले. सध्या रथापुढे २७ दिंड्या असतात. तर रथामागे ३०० दिंड्या चालतात. याशिवाय तात्पुरत्या नोंदीच्या मिळून सुमारे ५००च्या वर दिंडयापर्यंत हा सोहळा वाढला आहे. या सोहळ्यात अश्वाची तीन उभी रिंगणे व चार गोल रिंगणे होतात. आजही हैबतबाबांचे वंशज हा सोहळा चालवतात. शितोळे सरकरांचे घोडे, तंबू व नैवेद्य हा मान कायम आहे. १७ दिवसात सुमारे २७५ किमीचे अंतर पार करत पालखी पंढरपूरला पोहोचते.

रिंगणामागची कल्पना

धावणे हा अश्वांचा स्थायीभाव आहे. दररोज चालणाऱ्या अश्वांना कुठेतरी धावण्यासाठी जागा आणि उसंत मिळावी या उद्देशाने त्यांच्यासाठीच या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.

(संकलन : बाळासाहेब बोचरे)

टॅग्स :sant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी