शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भक्ताने सुरू केला ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 10:49 IST

कसल्याही परिस्थितीमध्ये माउलींच्या पादुका पंढरपूरला न्यायच्याच असा निश्चय करून त्यांनी वर्षभर जुळवाजुळव केली.

विविध  संतांच्या पालख्या या  त्यांच्या वंशजांनी सुरू ठेवल्या परंतु लहान वयातच समाधी घेतलेल्या संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा गुरू हैबतबाबा आरफळकर या  भक्ताने सुरू केला. नारायण महाराजानंतर त्यांच्या वंशजामध्ये भाऊबंदकी वाढली आणि १८३१ साली फक्त तुकाराम महाराजांच्याच पादुका पंढरपूरला नेल्या गेल्या. १८३१ माउलींच्या पादुका पंढरपूरला न गेल्याने माउलीभक्त असलेले गुरू हैबतबाबा यांना अतीव दु:ख झाले. सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकाराच्याकडे सरदार होते. पुढील वर्षी कसल्याही परिस्थितीमध्ये माउलींच्या पादुका पंढरपूरला न्यायच्याच असा निश्चय करून त्यांनी वर्षभर जुळवाजुळव केली. शिंदे सरकारांनी त्यासाठी मदत केली. अंकलीचे शितोळे सरकार यांनी घोडे व तंबूची सोय केली. खंडोजीबाबा भापकर आणि सुभानजी शेडगे यांच्यासह हैबतबाबांनी १८३२ साली ज्येष्ठ वद्य अष्टमीला संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरीची वारी सुरू केली. 

पाचशेवर दिंड्या

गुरु हैबतबाबांनी आळंदीकर आणि मल्लप्पा वासकर यांच्यासह पहिली दिंडी निर्माण केली. त्यानंतर दुसरी दिंडी खंडुजीबाबांची तर तिसरी दिंडी सुभानजी शेडगे यांची असा क्रम लावला. कालांतराने पादुका रथामधून नेल्या जाऊ लागल्या. ‘ज्ञानियाचा राजा ’ दिमाखात पंढरपूरला जाऊ लागला. त्यासाठी चौरीवाले, अबदागिरी, भालदार, चोपदार, सनई, चौघडा, शिंगवाले, भोई असे विविध मानकरीसुध्दा तयार झाले. सध्या रथापुढे २७ दिंड्या असतात. तर रथामागे ३०० दिंड्या चालतात. याशिवाय तात्पुरत्या नोंदीच्या मिळून सुमारे ५००च्या वर दिंडयापर्यंत हा सोहळा वाढला आहे. या सोहळ्यात अश्वाची तीन उभी रिंगणे व चार गोल रिंगणे होतात. आजही हैबतबाबांचे वंशज हा सोहळा चालवतात. शितोळे सरकरांचे घोडे, तंबू व नैवेद्य हा मान कायम आहे. १७ दिवसात सुमारे २७५ किमीचे अंतर पार करत पालखी पंढरपूरला पोहोचते.

रिंगणामागची कल्पना

धावणे हा अश्वांचा स्थायीभाव आहे. दररोज चालणाऱ्या अश्वांना कुठेतरी धावण्यासाठी जागा आणि उसंत मिळावी या उद्देशाने त्यांच्यासाठीच या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.

(संकलन : बाळासाहेब बोचरे)

टॅग्स :sant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी