दत्त जयंतीपूर्वीचे नऊ दिवस 'दत्त नवरात्र' म्हणून साजरे केले जातात. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी होते. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवांचे 'त्रिमुखी स्वरूप' असल्याने, या नऊ दिवसांच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या काळात केलेली उपासना साधकाला ज्ञान, शांती आणि भरभराट प्रदान करते.
Astro Tips: कर्जाचा पहिला हप्ता मंगळवारीच का फेडावा? जाणून घ्या ज्योतिषीय आणि धार्मिक कारण!
यंदा २७ नोव्हेंबर रोजी अर्थात मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला दत्त नवरात्र(Datta Navratri 2025) सुरु होणार असून ४ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला(Margashirsha Paurnima 2025) अर्थात दत्त जयंतीला(Datta Jayanti 2025) दत्त नवरात्र पूर्ण होणार आहे. हा कालावधी दत्त गुरूंच्या उपासनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यादृष्टीने दत्त नवरात्रीमध्ये कोणती उपासना करावी आणि कोणत्या उपायांनी सर्वाधिक फळ मिळते, याबद्दल माहिती घेऊया.
१. दत्त नवरात्र साजरी करण्याची पद्धत (कशी साजरी करावी?)
दत्त नवरात्रीचे नऊ दिवस (मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत) अत्यंत सात्त्विक आणि भक्तिमय वातावरणात साजरे केले जातात.
नित्य पूजा आणि संकल्प: दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे. देवापुढे दिवा लावून 'दत्त नवरात्री'च्या नऊ दिवसांच्या उपासनेचा संकल्प करावा.
गुरुचरित्राचे पारायण: दत्त उपासनेत 'श्री गुरुचरित्र' ग्रंथाला अत्यंत महत्त्व आहे. या नऊ दिवसांत गुरुचरित्राचे पारायण (वाचन) करावे. शक्य नसल्यास दररोज गुरुचरित्रातील किमान एक अध्याय वाचावा किंवा दत्त माहात्म्याच्या कथा वाचाव्यात.
आरती आणि भजन: दररोज सकाळ-संध्याकाळ भगवान दत्तात्रेयांची आरती आणि भजन करावे. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या नामजपाने वातावरण भक्तीमय ठेवावे.
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
दान आणि सेवा: या काळात शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करावे. गोसेवा (गाय आणि बैलांना चारा देणे) तसेच आपल्या गुरूंना यथाशक्ती दक्षिणा आणि सेवा अर्पण करावी.
सात्त्विक आहार: नऊ दिवस सात्त्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान आणि तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळावे. ब्रह्मचर्य पाळणे श्रेयस्कर मानले जाते.
२. सर्वाधिक फळ देणारी उपासना (कोणती उपासना अधिक फळ देते?)
दत्त नवरात्रीत उपासना अनेक प्रकारे केली जाते, पण काही विशिष्ट उपासना साधकाला त्वरीत आणि मोठे फळ देतात:
नामस्मरण (जप) : नामस्मरण ही सर्वात सोपी आणि प्रभावी उपासना आहे.
महामंत्र: "श्री गुरुदेव दत्त" किंवा "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" या मंत्राचा दररोज किमान १०८ वेळा जप करावा. हे मंत्र सिद्ध मानले जातात.
फळ: या नामस्मरणाने नकारात्मक ऊर्जा दूर होते, मनाला शांती मिळते आणि जीवनात सद्गुरूंची कृपा टिकून राहते.
गुरुचरित्र पारायण : गुरुचरित्राचे पारायण अत्यंत फलदायी मानले जाते. स्त्रियांनी गुरुचरित्र कथामृत वाचावे.
Datta Jayanti: दत्त नवरात्र सुरू होत आहे, नित्य उपासनेत समाविष्ट करा 'हे' दत्त स्तोत्र!
नियम: नऊ दिवसांत पारायण पूर्ण करण्याचा संकल्प करावा.
विशेष अध्याय: अनेक साधक विशिष्ट इच्छापूर्तीसाठी गुरुचरित्रातील १४ वा अध्याय वाचतात. हा अध्याय मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो.
दत्त स्तोत्रांचे पठण : दररोज 'दत्तमाला मंत्र' किंवा इतर दत्त स्तोत्रांचे पठण करावे. स्तोत्रांच्या पठणामुळे उच्च ऊर्जा निर्माण होते आणि साधकाभोवती एक संरक्षक कवच तयार होते.
गुरूंचे स्मरण : दत्तात्रेय हे 'गुरुतत्त्व' असल्याने, या काळात तुम्ही तुमच्या सद्गुरूंचे किंवा माता-पित्यांचे (जे तुमचे पहिले गुरू आहेत) स्मरण करावे. त्यांचे आशीर्वाद घेतल्यास दत्तात्रेयांची कृपा आपोआप प्राप्त होते.
दत्त नवरात्रीच्या या नऊ दिवसांत केलेले नामस्मरण, पारायण आणि सात्त्विक आचरण तुम्हाला केवळ आध्यात्मिक समाधानच देत नाही, तर संसारिक अडचणींवर मात करण्याची शक्ती आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी देते. तुमच्या श्रद्धेनुसार कोणतीही एक उपासना जरी तुम्ही समर्पित भावाने केली, तरी तुम्हाला नक्कीच उत्तम फळ मिळेल.
Web Summary : Datta Navratri, nine days before Datta Jayanti, is significant for spiritual growth. Observing rituals like Guru Charitra reading, chanting, and selfless service during this period brings peace, knowledge, and prosperity.
Web Summary : दत्त जयंती से पहले नौ दिन दत्त नवरात्र आध्यात्मिक विकास के लिए महत्वपूर्ण हैं। इस दौरान गुरु चरित्र पढ़ना, जप करना और निस्वार्थ सेवा जैसे अनुष्ठान करने से शांति, ज्ञान और समृद्धि मिलती है।