शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

Dasbodh Jayanti 2022: समर्थ रामदास स्वामींनी ३०० वर्षांपूर्वी रचलेल्या दासबोधाची आजही अवीट गोडी; पाहा, जन्मकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 14:52 IST

Dasbodh Jayanti 2022: समर्थ रामदास स्वामींनी १७ व्या शतकात रचलेल्या दासबोधाची आजही अनेक ठिकाणी पारायणे केली जातात.

जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।, अशी शिकवण देणाऱ्या समर्थ रामदास स्वामी (Samartha Ramdas Swami) यांनी अनेकविध श्लोक, स्तोत्रे, ग्रंथ यांच्या माध्यमातून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. रामाची आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य लोकांना पटवून दिले. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. समर्थ रामदासांच्या रचनांमधील सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे दासबोध. समर्थ रामदास स्वामी यांनी माघ शुद्ध नवमी या दिवशी दासबोध ग्रंथाची रचना केल्याचे सांगितले जाते. यंदा, १० फेब्रुवारी २०२२ रोजी दासबोध जयंती आहे. (Dasbodh Jayanti 2022)

रामदास स्वामी आणि संत तुकाराम समकालीन होते. समर्थ रामदास स्वामी यांनी १७ व्या शतकात रचलेला दासबोध कालातीत असून, आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो. लग्नाच्या बोहल्यावर सावधान झालेल्या रामदासांनी संसार कसा करावा, संसार कसा असावा, याचे नेमके ज्ञान दिले. दासबोधाच्या माध्यमातून रामदास स्वामींनी नेटका उपदेश समाजाला केला आहे. सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगत आरोग्याचा गुरुमंत्र देत मनावर ताबा मिळवल्यास अनेक गोष्टी सुलभ होतात, याचे ब्रह्मज्ञान रामदासांनी समाजाला दिले. समर्थ रामदासांनी आपल्या कार्याने महाराष्ट्रधर्म वाढविला. सर्वसामान्य जनतेत भक्तिमार्गातून शक्तीच्या उपासनेचा, संघटित होण्याचा मूलमंत्र दिला. मारुतीच्या उपासनेतून त्या काळातील समाजाला शरीरस्वास्थ्याचा मार्गही दाखविला.

समर्थांनी दासबोध ग्रंथ कुठे रचला?

माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबीड अरण्यात शिवथरघळ येथे दासबोध ग्रंधाची निर्मिती करण्यात आली, असे सांगितले जाते. रामदास स्वामी यांनी आपले पट्टशिष्य कल्याण स्वामी यांच्याकरवी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. दासबोधाला ग्रंथराजाची उपमा दिली जाते. समर्थ रामदास स्वामींचा 'दासबोध' हा ग्रंथ म्हणजे विविध विषयांवरील तत्त्वचिंतनांचे मराठी भाषेतील साहित्याचे अमोल लेणे आहे. 

ग्रंथराज दासबोधाची रचना कशी आहे?

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेला ग्रंथराज दासबोध एकूण २० दशकांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक दशकात १० समास आहेत. समर्थांनी दोन वेळा दासबोधाची निर्मिती केली, असे सांगितले जाते. पहिला दासबोध ग्रंथ २१ समासाचा होता आणि नंतरचा दासबोध २०० समासी असल्याचे म्हटले जाते. जुन्या आणि नंतरच्या दासबोधाचे एकत्रिकरण केले गेले. त्यावर संपादकीय संस्कार करून अनेक प्रकाशकांनी दासबोधांच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या. दासबोध ग्रंथाची अनेक ठिकाणी आजही पारायणे केली जातात. 

दासबोध ग्रंथाची वैशिष्ट्ये

रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती-पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. गुरु-शिष्य संवाद असे दासबोध ग्रंधाचे स्वरुप असून, हा ग्रंथ कोणता, त्याचे नाव काय, या ग्रंथात प्रामुख्याने काय सांगितलेले आहे, या ग्रंथामुळे काय मिळेल, अशी माहिती देणाऱ्या ओव्या दासबोध ग्रंथाच्या प्रारंभी येतात. मूर्खांची लक्षणे, नवविधा भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे. दासबोधातून रामदासांनी निश्चयात्मक आणि विवेकपूर्ण लिखाण केले आहे. केवळ दशकांच्या नावावरून समर्थांनी मानवी जीवनाचा आणि मानवी मनाचा किती सखोल अभ्यास केला आहे, याची प्रचिती येते. मनाचे श्लोक रचणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचा उल्लेख केवळ ग्रंथराज असाच करता येईल. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक