शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कवी कुसुमाग्रज यांच्या 'कणा' कवितेची आठवण करून देणारी सुंदर गोष्ट... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 08:00 IST

संकटकाळात धीर देणारे असे शिक्षक प्रत्येकालाच हवे असतात, नाही का?

एक विद्यार्थी आपल्या अनंत अडचणींवर तोडगा काढण्यासाठी एक दिवस आपल्या लाडक्या शिक्षकांची भेट घेतो. शिक्षक त्याला म्हणतात, 'आज या हुशार विद्यार्थ्याला एवढा काय प्रश्न पडला आहे बरं?'विद्यार्थी सांगतो, 'सर थोडी खाजगी बाब आहे. हे आपल्या अभ्यासाशी संबंधित नाही. पण तुमच्याजवळ मन मोकळं करावं, म्हणून थेट घरीच आलो.'शिक्षक म्हणाले, 'काहीच हरकत नाही. काय बोलायचं आहे, मोकळेपणाने बोल.' विद्यार्थी म्हणाला, 'सर, घरची परिस्थिती बेताची आहे. आई बाबांची आजारपणं, मोठ्या बहिणीचे लग्न, माझा अभ्यास, भविष्यातील नोकरी, स्थैर्य, करिअर असे अगणित प्रश्न मला सुखाने झोपू देत नाहीत. मी सतत अस्वस्थ असतो. नशिबाला दोष देत असतो. काय करू कळत नाही. तुमचं मार्गदर्शन हवं आहे.' 

सर उठले आणि म्हणाले, 'मला शिकवण्याबरोबरच पाककलेचीही आवड आहे. तुला कोणती आवड आहे?'असे म्हणत शिक्षक उठत त्यांच्या स्वयंपाक घरात गेले आणि त्यांनी विद्यार्थ्याला तिथेच बोलावून घेतले. आपण एवढा महत्त्वाचा विषय मांडत असताना शिक्षकांचे असे वागणे विद्यार्थ्याला चमत्कारिक वाटले. शिक्षकांनी बोलता बोलता तीन शेगड्यांवर तीन सारख्या आकाराची भांडी ठेवली आणि त्यात तीनही भांड्यांमध्ये समान पातळीत पाणी ठेवले. गप्पा मारत असताना पाणी उकळू लागले. शिक्षकांनी एका भांड्यात बटाटा, दुसऱ्यात अंडे आणि तिसऱ्यात कॉफीच्या बिया टाकल्या. पाच मिनिटे आणखी उकळल्यावर त्यांनी गॅस बंद केला आणि त्या तीनही भांड्यांकडे बोट दाखवत शिक्षक म्हणाले, 'हे आहे तुझे उत्तर!'

विद्यार्थी गोंधळला, 'समजलो नाही सर', असे म्हणाला..शिक्षक म्हणाले, 'समान तपमानात तीन वेगवेगळ्या पदार्थांवर झालेली प्रक्रिया बघ. बटाटा गळून गेला. अंडे कडक झाले आणि कॉफीच्या बिया विरघळून मंद सुवास देऊ लागल्या. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. पण त्यांना कोण कशा पद्धतीने प्रतिसाद देतो, यावर त्या अडचणींचे भविष्यकालीन रूप ठरते. तू या तिन्ही पदार्थांपैकी कोणासारखे व्हायचे ते ठरव. मग तुला त्या अडचणी डोंगरासारख्या न वाटता जीवनाचा एक भाग वाटतील आणि तू त्यांना सहज तोंड देऊ शकशील.'

शिक्षकांच्या समाजवण्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आला. त्याने शिक्षकांना नमस्कार करत कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी म्हटल्या... मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा...!