शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

Ashadhi Ekadashi 2021 : आज विठ्ठलभक्तांची देहाची नाही पण मनाची वारी पूर्ण झाली,  तो आनंदसोहळा माऊलींच्या शब्दात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 8:00 AM

Ashadhi Ekadashi 2021: वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दोन वर्षे खंड पडला. परंतु, जो खरा भक्त आहे, तो मनाने कधीच पंढरपुरात पोहोचला.

आज आषाढी एकादशीचा दिवस. देहाने वारीत सहभागी होऊ न शकलेले वारकरीसुद्धा आज मनाने वारी करत पंढरपूरात पोहोचले असतील. तिथे गेल्यावर चंद्रभागेत स्नान करून, भक्त पुंडलिकाची भेट घेतल्यावर, पांडुरंगाच्या गाभाऱ्यात, भक्तांच्या गर्दीत दुरून अगदी क्षणभर झालेले पांडुरंगाचे दर्शन आनंदून टाकणारे आहे, ते सांगताना माऊलींच्या शब्दाचा आधार वाटतो.

रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी।तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा।बहुत सुकृताची जोडी, म्हणुनि विठ्ठली आवडी।सर्व सुखाचे आगर, बापरखुमादेवीवर।।

माऊलींच्या या रूपाच्या अभंगाला परंपरेत महत्वाचे स्थान आहे. अभंग संप्रदायातल्या प्रत्येकाला तो मुखोद्गत असतो. तुकोबांचा ध्यानाचा अभंग `सुंदर ते ध्यान' आणि माऊलींचा `रूप पाहता लोचनी' हा अभंग हरिपाठात नित्यनेमाने म्हटला जातो. या दोन्ही अभंगांचे वैशिष्ट असे, की रूपाच्या अभंगात रूपाचा उल्लेख नाही आणि ध्यानाच्या अभंगात नामाचा उल्लेख नाही. हे योगायोगाने घडले आहे. एवढी वर्षे हा अभंग म्हटला, गायला जात आहे. 

संत ज्ञानेश्वर काय किंवा तुकोबा काय, दोघेही भक्तिप्रेमाचे मूर्तिमंत पुतळेच होते. त्यांचे श्वासोश्वास हेच मुळी अभंग होते त्याचे जगणे हा भगवंत भक्तीच्या प्रेमाचा अविष्कार होता. त्यांच्या प्रत्येक रचनेतून विठ्ठल भक्ती पाझरते आणि त्या अभंगाची गोडी आपल्याला सुखावून टाकते. 

आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनाने पावन झालेला भक्त त्याच्या रूपाचे, नामाचे गोडवे गात गातच बाहेर पडला असता. वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दोन वर्षे खंड पडला. परंतु, जो खरा भक्त आहे, तो मनाने कधीच पंढरपुरात पोहोचला. ता राजस सुकुमारदेखील भक्ताच्या भेटीसाठी आसुसला होता. जीवाशिवाची भेट झाली, की भक्त आणि भगवंत हा भेद राहतोच कुठे? अशीच काहीशी परिस्थिती दर एकादशीला पहायला मिळते. 

या विठ्ठलनामाची गोडी लागण्यासाठी आपले सुकृत चांगले असावे लागते. महाराष्ट्राचे सुकृत चांगले म्हणून हा विठ्ठल भक्तीचा ठेवा वारसा हक्काने आपल्याला मिळाला. आपणही ही परंपरा सुरू ठेवूया आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करूया. तूर्तास सर्व सुखाचे आगर असणाऱ्या पंढरीनाथाचे डोळे भरून रूप मनात साठवून घेऊया...जय हरी!

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी