शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

बीड शहरात दूषित पाणीपुरवठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:23 AM

बीड शहरातील काही भागांत दोन दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहेत. सांडपाणी म्हणून वापरात आणण्या एवढेही पाणी शुद्ध नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपासून बीडकर विकतच्या पाण्यावर तहान भागवित असून तात्काळ उपाययोजना करण्यात बीड पालिका अपयशी ठरल्याचा आरोप केला जात आहे.

ठळक मुद्देविकतचे पाणी घेऊन भागविली तहान

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील काही भागांत दोन दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहेत. सांडपाणी म्हणून वापरात आणण्या एवढेही पाणी शुद्ध नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपासून बीडकर विकतच्या पाण्यावर तहान भागवित असून तात्काळ उपाययोजना करण्यात बीड पालिका अपयशी ठरल्याचा आरोप केला जात आहे.

बीड शहराला माजलगाव व बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. वीज बिल थकल्यामुळे महावितरणने दोन्ही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला. चार दिवसानंतर वीज भरले आणि पाणी पुरवठा सुरळीत झाला. पाणी जरी आले असले तरी ज्या ठिकाणाहून पाणी ओढले जाते, त्याठिकाणी घाण झाली होती. तसेच जलवाहिनीही दूषित झाली होती. याचा जलवाहिनीतून पुन्हा पाणीपुरवठा झाल्याने शहरातील पिंपरगव्हाण रोड, भक्ती कन्स्ट्रक्शन, अंबिका चौक भाग अशा अनेक ठिकाणी दूषित पाणी आले. पाण्याची दुर्गंधी सुटली होती. हे पाणी सांडपाणी म्हणूनही वापरण्यास योग्य नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकावयास मिळाल्या.

दरम्यान, पालिकेने सध्या जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी पाऊले उचलल्याचे सांगण्यात आले. तरीही आणखी किमान दोन दिवस सर्व जलवाहिनी स्वच्छ होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे या दोन दिवसात ज्या भागात पाणी आले आहे, त्यांच्यामधून पालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाणीपुरवठा अभियंता निखिल नवले म्हणाले, पाणीपुरवठा बंद असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. नागरिकांनी घाबरू नये. पालिका प्रयत्न करीत आहे.आरोग्यास धोकादूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्वचा व इतर आजार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :BeedबीडWaterपाणीMarathwadaमराठवाडाHealthआरोग्य