शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

बीड शहराला १४ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:11 AM

पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यात वरूणराजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यात वरूणराजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. सद्यस्थितीत शहरात १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून दिवभरात ५० ते ६० खेपा केल्या जात आहेत. हद्दवाढ भागात मात्र, आजही पाणीपुरवठा विस्कळीतच असल्याचे सांगण्यात आले.जून संपून जुलैचा पहिला आठवडाही पूर्ण झाला. मात्र, अद्यापही जिल्ह्यात कोठेच वरूणराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे जलसाठे कोरडेठाक आहेत. बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाली येथील बिंदुसरा आणि माजलगाव धरणही कोरडे पडले आहे. सध्या माजलगाव धरणात चर खोदून बीड शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.मात्र, मागणीपेक्षा कमी पाणी येत असल्याने शहरात १० ते १५ दिवसानंतर नळाला पाणी येते. त्यामुळे बीडकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.दरम्यान, शहरात तरी १५ दिवसाला पाणी येते. मात्र, हद्दवाढ भागात तर पाणीच येत नाही. आले तर कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. हाच धागा पकडून पालिकेने शहरात १४ टँकरने पाणीपुरवठा केला आहे. हे टँकर खासकरून स्वराज्य नगर, सोमेश्वर मंदिर परिसर, संत नामदेव नगर, अंकुश नगर, बार्शी रोड, पिंपरगव्हान रोड आदी भागात आहेत. तसेच जिल्हा रूग्णालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा कारागृह, वसतीगृह, शाळा आदी ठिकाणीही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे सुपरवायझर पी.आर.दुधाळ यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकDamधरण