शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गावपातळीवर सर्वेक्षण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:11 IST

जिल्ह्यात १९ आॅक्टोबरपासून सतत मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या हंगामातील सरासरीच्या ४२९ टक्के इतका पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देबीड जिल्हा प्रशासनानेच कळविले विमा कंपनीला : ७२ तासांच्या अटीबाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पंचनाम्याचे काम झाले सुरू

बीड : जिल्ह्यात १९ आॅक्टोबरपासून सतत मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या हंगामातील सरासरीच्या ४२९ टक्के इतका पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विमा कंपनीकडून तालुकास्तरावर नियुक्त केलेले कर्मचारी अपुरे असल्यामुळे शेतक-यांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गाव पातळीवरील कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस जि.प.चे सीईओ अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव, प्रविण धरमकर, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, शोभा ठाकूर, विमा कंपनीचे प्रतिनिधी अमित गौडा यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना पाण्डेय म्हणाले, गाव पातळीवरील पिक विमाबाबत नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुका कृषी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील मंडळ कृषी अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी व पिकविमा कंपनीचे प्रतिनिधी यांची समिती सर्वेक्षण करून अहवाल सादर करणार असून या अहवालाच्या आधारे पिक विमा नुकसानीचे माहिती जिल्हा प्रशासनामार्फत विमा कंपनीस दिली जाईल, असे त्यांनी सांगीतले.प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१९ अंतर्गत अधिसूचित क्षेत्रातील पीक कापणी करून सुकवण्यासाठी पसरवून ठेवलेल्या पिकांसाठी तसेच सततच्या पावसामुळे बाधित क्षेत्रातील अधिसूचित पिकाचे नुकसान झालेल्या पात्र शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकºयांद्वारे अर्ज दाखल करण्यासाठी तालुका कृषी अधिकाºयांकडे गर्दी होत आहे. विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक देखील बंद असल्याने अडचणीचे ठरत आहे.यामुळे गाव पातळीवर अर्ज स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांची अडचण दूर झाली आहे.शेतक-यांनी काळजी करू नयेपिक विमा अर्जासोबतच राज्य शासनाकडून मिळणाºया नुकसान भरपाई मदतीसाठी देखील पंचनामे करण्यात येणार असून, त्याची माहिती राज्य शासनाकडे स्वतंत्ररित्या सादर केली जाईल यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना प्रधानमंत्री पिक विमा योजना आणि राज्य शासनाच्या अतिवृष्टीसाठी मिळणाºया नुकसान भरपाईचा लाभ देखील मिळू शकेल यामुळे शेतकºयांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करु नये व काळजी करू नये असे आवाहन देखील जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी केले.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीdroughtदुष्काळ