शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बीडमध्ये दोनशे हेक्टरवरील डाळिंबाच्या बागा वाळल्या; केळी, आंब्याच्या बागांत तीच परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 4:35 AM

आईच्या नावे असलेल्या साडेनऊ एकरपैकी एक एकर क्षेत्रात डाळिंबाची पाच वर्षापूर्वी लागवड केली.

- दीपक नाईकवाडेकेज (जि. बीड) : बारा वर्षांपूर्वी लागवड करून जोपासलेल्या डाळिंबाच्या दोनशे हेक्टर क्षेत्रातील बागा यावर्षीच्या दुष्काळाने वाळून गेल्याने उंदरी (ता. केज) येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केळी व आंब्याच्या बागांची अशीच परिस्थिती झाली आहे.उंदरी येथे २००८ पासून येथील शंभरावर शेतकऱ्यांनी भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड करण्यास सुरुवात केली. डाळिंबाच्या विक्रमी उत्पादनासाठी उंदरचे नाव महाराष्ट्रात झाले. त्यासाठी तत्कालीन कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी प्रोत्साहन दिले.दुष्काळाने विहिरीसह बोअरवेल व शेततळ्यातील पाणी आटल्याने शेजारच्या शेतकºयांकडून एक हजार रुपये तासाने पाणी घेतले. मात्र पाणी कमी पडल्याने केळीची बाग ऐन भरात वाळून गेली, असे उत्तम ठोंबरे यांनी सांगितले.आईच्या नावे असलेल्या साडेनऊ एकरपैकी एक एकर क्षेत्रात डाळिंबाची पाच वर्षापूर्वी लागवड केली. एक एकरात आंबा व शेवगा लावला. डाळिंबास कळी लागून माल धरण्यास सुरुवात होताच पाणी कमी पडल्याने डाळिंबासह आंबा व शेवगा वाळून गेला, अशी व्यथा मधुकर ठोंबरे यांनी मांडली.दोन एकर बाग टँकरवरदहा एकरात २००८ मध्ये भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली. २००८ मध्ये शेततळे घेतले. चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणले. दुष्काळाने १० एकरची डाळिंबाची बाग दोन एकरवर आल्याने पंचवीस लाख रूपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. दोन एकर बाग टँकरने पाणी आणून जगवत आहे.- भागवत ठोंबरे, शेतकरीतीन लाखांचा फटकासाडेचार एकर क्षेत्रापैकी दोन एकरमध्ये गेल्या दहा वर्षांपूर्वी डाळिंबाची लागवड केली होती. दरवर्षी पंधरा टन उत्पादन निघत होते. यावर्षी बाग धरण्यासाठी ७० हजार रुपयांचा खर्च केला. बाग हातची गेल्याने तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यातच भावाच्या शेतातील एक हेक्टर क्षेत्रातील गावरान आंब्याची बाग वाळून गेली.- नानासाहेब मोहन जाधव, शेतकरी

टॅग्स :droughtदुष्काळ