शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ही अनोखी गाठ! विरोधाला झुगारून जीवन अन् तृतीयपंथी साक्षीने सुरू केला सुखाचा संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 18:50 IST

कुटुंबियांचा टोकाचा विरोध झुगारून दोघेही अखेर विवाह बंधनात अडकली

- मधुकर सिरसटकेज (बीड) : हिंगोली येथील  तृतीय पंथी साक्षी ( 20 ) आणि गेवराई येथील जीवन ( 24) दोघांना  एकमेकांचे विचार पटले आणि त्यांची मने जुळली.  पुढे जाऊन त्यांनी लग्न करुन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, जीवनच्या नातेवाइकांनी यास विरोध केला. विरोधाला न जुमानता प्रेमात आकंठ बुडालेल्या जीवन आणि साक्षी यांनी अखेर घराबाहेर पडत सामाजिक कार्यकर्त्यांचा मदतीने महाशिवरात्री दिनी लग्न केले. 

हिंगोली येथील साक्षी नर्सिंगचे शिक्षण घेते तर गेवराई येथील जीवनने पशूधन विकास अधिकाऱ्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तो सध्या केज शहरात खाजगी पशू रुग्णालयात नोकरी करतो. सहा महिन्यांपूर्वी जीवन आणि साक्षी यांची ओळख गढी- बीड रोडवरील टोल नाक्यावर झाली. जीवनचा गावाकडे जाण्याचा मार्ग तोच असल्याने नियमित भेटी होत गेल्या. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचे मनोमन ठरविले होते. परंतु, समाजात नाचक्की होईल म्हणून जीवनच्या नातेवाईकांनी या विवाहाला विरोध केला.  

कुटुंबियांकडून टोकाचा विरोध होत असल्याने दोघे केज येथे आले. येथे सामाजिक कार्यकर्त्या व तृतीयपंथी जिल्हा समितीच्या सदस्या गौरी शिंदे यांची भेट घेऊन दोघांनीही लग्न करून आयुष्यभर सोबत राहणार असल्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर गौरी शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे, योगेश गायकवाड, बबलू साखरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातील भीमनगर येथील विहारात बौद्ध पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पाडला. 

टॅग्स :marriageलग्नBeedबीडTransgenderट्रान्सजेंडरsocial workerसमाजसेवक