शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरुन ओढले रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:38 IST

बीड : रेल्वेकडे डोळे लावून बसलेल्या बीडकरांनी २० ऑगस्ट रोजी जिल्हावासीयांच्या अस्मितेच्या नगर-बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम रखडल्याने प्रशासनाने लक्ष ...

बीड :

रेल्वेकडे डोळे लावून बसलेल्या बीडकरांनी २० ऑगस्ट रोजी

जिल्हावासीयांच्या अस्मितेच्या नगर-बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम रखडल्याने प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी २० ऑगस्ट रोजी शहरातून रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन ओढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आले. रखडलेला रेल्वेप्रश्न रुळावर आणण्यासाठी चक्क रस्त्यावरुन इंजिन ढकलण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी होते.

या स्थळापर्यंत ओढत घेऊन जाऊन प्रतीकात्मक रेल्वेचे उद्घाटन करण्यासाठी सेल्फी स्टॅन्ड ठेवण्यात आले. या अनोख्या आंदोलनाची बीडमध्ये चर्चा झाली.

जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या रेल्वेप्रश्नावर आजपर्यंत अनेकदा आंदोलने झाली. अनेक वर्षांपासून अनेक आंदोलने झाली, परंतु सरकार व राजकीय इच्छाशक्ती नसलेले लोकप्रतिनिधी व आडमुठे प्रशासन यांच्यामुळे नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गास उशीर झाला. रेल्वे मार्गासाठी राज्याने ५० टक्के व केंद्राने ५० टक्के वाटा उचलला. मात्र, प्रत्येकवेळी निराशाच झाली. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन ओढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेले. यावेळी

कृती समितीचे अध्यक्ष जयप्रकाश आघाव, उपाध्यक्ष ॲड.गणेश करांडे, सचिव संगमेश्वर आंधळकर, ॲड.अंबादास आगे, मोहन जाधव, ॲड.शैलेश जाधव, नगरसेवक युवराज जगताप, राजेश शिंदे, गणेश मस्के, ॲड.महेश धांडे, राजेंद्र नाईकवाडे,मळीराम यादव, जोतीराम हुरकुडे,चेतन पोर्कणा, ॲड.शफिक शेख,बाबू लव्हाळे आदी सहभागी झाले होते. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी रेल्वेमार्गाचे प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.

...

रेल्वेचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित ठेवल्याने विकास खुंटला. या प्रश्नावर अनेक वर्षे राजकारण झाले.अनेकांनी सोयीपुरता हा प्रश्न हाताळला, पण जिल्हावासीयांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे प्रतीकात्मक आंदोलन करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

- संगमेश्वर आंधळकर, आंदोलक

...

नगर-बीड- परळी रेल्वेसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली; मात्र प्रत्येकवेळी केवळ आश्वासने देण्यात आली. खुद्द पंतप्रधानांनी बीडमध्ये झालेल्या सभेत रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले;मात्र अजूनही या कामास गती मिळाली नाही.

- ॲड.शैलेश जाधव, आंदोलक

....