शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

माजलगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:46 IST

सध्या शेतकरी दुष्काळाने त्रस्त असताना साखर कारखाने शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस घ्यावा यासह तालुक्यातील दुष्काळ निवारण त्वरित करण्यात यावे, या मागण्यांसाठी गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने परभणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देबारदाण्यासह आंदोलन : कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस न्यावा, रोजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : सध्या शेतकरी दुष्काळाने त्रस्त असताना साखर कारखाने शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस घ्यावा यासह तालुक्यातील दुष्काळ निवारण त्वरित करण्यात यावे, या मागण्यांसाठी गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने परभणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.तालुक्यातील दुष्काळ निवारणाची कामे त्वरित सरू करण्यात यावेत, या मागणीसह दोन वर्षांपूर्वी माजलगाव तालुक्यातील तीन साखर कारखान्यांची बैठक घेऊन २६५ जातीचा ऊस घेणार नसल्याचे जाहीर केले होते.परंतु त्यानंतर साखर आयुक्तांशी झालेल्या बैठकीनंतर कारखान्यांनी तसे आदेश दिले होते. त्यानंतर कारखान्यांनी हा ऊस उचलला परंतु पुन्हा कारखाने आडकाठी आणत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. आधीच दुष्काळ त्यातच हुमनी अळीने ऊसाचे वाळवण झाले. अनेक शेतकºयांचा ऊस पाण्याअभावी जळून जात आहे. गत वर्षी कारखान्यांनी घेतलेल्या उसाचे बिल दिले नाही. यात माजलगाव कारखाना ) ८०० रू.टन, छत्रपती कारखाना ७०० रु .टन, जय महेश कारखाना ४५० रु .टन प्रमाणे बिल दिलेले नाही. हे बिल आता दिले तर शेतकºयांना दुष्काळात मदत होईल. त्यामुळे ते त्वरित देण्यात यावे गेटकनचा ऊस आणू नये, सरसगट कर्ज माफी करावी, रोजगार हमीची कामे सुरू करावीत, यासह इतर मागण्यांसाठी परभणी चौकात बुधवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभिषण थावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैलगाडी बारदाण्यासह एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार एन.जी.झम्पलवाड यांना दिले. दरम्यान यावेळी मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.सरसकट कर्ज माफीची केली मागणीदुष्काळ निवारणाची कामे त्वरित सुरू करण्यात यावीत, या मागणीसह कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस गाळपासाठी न्यावा, गेटकेनचा ऊस आणू नये, सरसकट कर्जमाफी करुन रोजगार हमीची कामे सुरू करण्याची केली मागणीपरभणी चौकात झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजुस वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सदरील आंदोलन एक ते दीड तास चालले. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagitationआंदोलन