शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

परतीच्या पावसाने रान उद्ध्वस्त,आता दुबार पेरणीचे संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 4:20 PM

९६० हेक्टरवरील पिकांचे परतीच्या पावसाने केले वाटोळे

- नितीन कांबळे 

कडा (जि. बीड) : परतीच्या पावसाने आम्हाला उद्ध्वस्त केलंय. समदा पावसाळा गेला, पण शेतीला पाहिजे तसा पाऊस नाही झाला आणि पुन्हा परतीचा पाऊस सुरू झाला.  उसनवारी करून शेतीत गाडलेले बी उगवून वर येताच या पावसाने सगळे उद्ध्वस्त केले.  

परतीच्या पावसाने आमची रान उपाळली,  आता दुबार पेरणीचे संकट आमच्या नशिबी आल्याची कैफियत आनंदवाडी सराटेवडगाव येथील शेतकरी उत्तम कापरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. आष्टी तालुक्यातील आनंदवाडी, सराटेवडगाव येथे प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.     

आष्टी तालुक्यात  शेतात मोठ्या मेहनतीने कांदा, ज्वारी, हरभरा, मठ , कपाशी, तुरीची लागवड केली होती. पण   परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जेव्हा पावसाची खरी गरज होती तेव्हा पाण्याविना पिके कोमात गेली आणि आता पाण्यामुळे पिके धोक्यात आली, अशी अवस्था  आहे. आनंदवाडी येथील ४३१ हेक्टर  व  सराटेवडगाव येथील ५३०  हेक्टर क्षेत्र अशा एकूण ९६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे अमोल सुंबरे, राजाराम ननवरे यांनी सांगितले. तर परतीचा पाऊस चांगला झाला आणि रान उपळून मनस्ताप झाल्याचे येथील शेतकरी रामदास तरटे म्हणाले. 

शासनाने तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. कारण दुबार पेरणीसोबतच आर्थिक संकटदेखील ओढावल्याचे येथील सरपंच प्रा.राम बोडखे यांनी सांगितले. ४० हजार हेक्टरातील पिकांचे नुकसान झाले आहे.  कांदा, सोयाबीन, कापूस, बाजरी या पिकांची माती झाली आहे. पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्राथमिक नुकसान झालेल्या चाळीस हजार हेक्टर क्षेत्राचा अहवाल सादर केल्याचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसBeedबीड