शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

धुलीवंदनानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST

बीड : जिल्ह्यात होणाऱ्या कोविड प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत शिथिलता देण्यात यावी यासाठी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि ...

बीड : जिल्ह्यात होणाऱ्या कोविड प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत शिथिलता देण्यात यावी यासाठी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेतली.यावेळी धुलीवंदनानंतर संचारबंदीच्या कालावधीत शिथिलता देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे व्यापारी, कामगार, मजूर आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे

जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. मात्र केवळ दोन तासांचा शिथिल वेळ पुरेसा नसल्याने शुक्रवारी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह व्यापारी संघटनेचे दीपक कर्नावट, सूर्यकांत महाजन,अशोक शेटे, जवाहर कांकरिया,प्रकाश कानगावकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेतली. यावेळी शहरातील संचारबंदीच्या शिथील कालावधीत वाढ केल्यास जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना, दूधविक्रेत्यांना भाजीपाला व फळविक्रेत्यांना दिलासा मिळेल, असे पटवून देण्यात आले. प्रशासनाने नियमानुसार कडक निर्णय घ्यायलाच हवेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनतेनेदेखील प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. लागू केलेले नियम हे योग्यच आहे मात्र संचारबंदीच्या कालावधीत दोन तास हे पुरेसे नाहीत त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांच्या दृष्टीने हा कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. धुलीवंदनानंतर वेळेत शिथिलता देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

===Photopath===

260321\262_bed_24_26032021_14.jpeg

===Caption===

शुक्रवारी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या सोबत चर्चा केली.