शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

रानमेवा : बालाघाटाच्या डोंगरातील सीताफळे धारुरच्या आठवडी बाजारात, प्रक्रिया उद्योगाअभावी भाव मिळेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:31 IST

धारूर येथील आठवडी बाजार तसेच इतर दिवशीही सीताफळे विक्रीस येत आहेत. मात्र, येथे प्रक्रिया उद्योग नसल्याने ती कवडीमोल दरात विक्री होत आहेत.

ठळक मुद्दे बालाघाटाच्या डोंगरामध्ये नैसर्गिकरित्या उगवलेल्या झाडांपासून सीताफळाचे उत्पादन मिळते. सीताफळाच्या व्यवसायातून दरवर्षी ४० ते ५० लाखांची उलाढाल होते. तालुक्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उसतोड कामगार स्थलांतर करतात. सीताफळ प्रक्रिया उद्योग उभा राहिल्यास हे स्थलांतर थांबू शकेल. 

- अनिल महाजन

धारूर (बीड) : बालाघाटाच्या डोंगरामध्ये नैसर्गिकरित्या उगवलेल्या झाडांपासून सीताफळाचे उत्पादन मिळते. मागील २० दिवसांपासून सीताफळे बहरात आले आहेत. धारूर येथील आठवडी बाजार तसेच इतर दिवशीही सीताफळे विक्रीस येत आहेत. मात्र, येथे प्रक्रिया उद्योग नसल्याने ती कवडीमोल दरात विक्री होत आहेत.

तालुक्यातील जमीन हलक्या प्रतीची व मुरमाड आहे. या जमिनीत नैसर्गिकरीत्या उगवलेली सीताफळांची खुरटी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. कसल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर केला जात नसल्याने ही सीताफळे सेंद्रीय प्रकारात मोडतात. चवीला मधुर व रसाळ असल्याने या सीताफळांना राज्याबाहेरही मागणी असते.  या वर्षी पावसामुळे सीताफळे चांगली पोसली आहेत.

तालुक्यात ६ हजार ६०० हेक्टर जमीन वनविभागाच्या ताब्यात आहे. बहुतांश जमीन डोंगराळ असल्याने मोठया प्रमाणात सीताफळांची झाडे आहेत . या जमिनीत वनविभागामार्फत दरवर्षी सीताफळांच्या झाडांची लागवड करण्यात येते. वनजमिनीतून मिळणा-या सीताफळांचा दरवर्षी लिलाव करण्यात येतो. यातून ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न वनविभागाला मिळते.या वर्षी काही खंडानंतर पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. यामुळे सीताफळे चांगली पोसली आहेत. मागील २० दिवसांपासून महिला मजूर, सुटी असल्याने शाळकरी मुले सीताफळांची तोडणी करुन आठवडी बाजारात विक्रीस आणू लागले आहेत. 

व्यापारी टोपलीवर भाव ठरवून खरेदी करतात. एका टोपलीतून " १५० ते २०० मिळतात. एक विक्रेता दिवसातून दोन टोपलीच्या जवळपास   सीताफळे विक्री करतात. परिसरातील काही व्यापारी  सीताफळांची कवडीमोल किंमतीत खरेदी करतात व नंतर इतर बाजारात पाठवितात. सीताफळ तोडणीपासून तीन ते चार दिवसात खाण्यायोग्य होते. नंतर ते खराब होत असल्याने त्याची साठवणूक करता येत नाही. खरेदी केलेली सीताफळे टेम्पोच्या सहाय्याने औरंगाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर तसेच गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद इ.  ठिकाणी विक्रीस नेतात. सीताफळाच्या व्यवसायातून दरवर्षी ४० ते ५० लाखांची उलाढाल होते.

राजकीय नेतृत्वाच्या अभावाने प्रश्न रखडला - साधारणत: पावसाळ्याच्या सुरुवातीला जून-जुलै महिन्यात पानगळ झाल्यास सीताफळांच्या झाडांना कळ्या लागण्यास सुरुवात होते.- पावसाळ्याच्या कालावधीत चांगला पाऊस झाल्यास सीताफळे लवकर पोसली जातात.- सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात सीताफळे परिपक्व होतात. सीताफळ कळ्या येण्यापासून तोडणीपर्यंत चार महिन्यांचा कालावधी लागतो.- धारूर येथे सीताफळावर प्रक्रिया उद्योग व्हावा अशी अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी आहे. परंतु प्रभावी राजकीय नेतृत्त्वाअभावी हा प्रश्न कायमस्वरूपी सखडलेला आहे.- तालुक्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उसतोड कामगार  स्थलांतर करतात. सीताफळ प्रक्रिया उद्योग उभा राहिल्यास हे स्थलांतर थांबू शकेल. - येथील सीताफळास जी. आय. मानांकन ही मिळालेले आहे. प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीची गरज आहे.