शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

रानमेवा : बालाघाटाच्या डोंगरातील सीताफळे धारुरच्या आठवडी बाजारात, प्रक्रिया उद्योगाअभावी भाव मिळेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:31 IST

धारूर येथील आठवडी बाजार तसेच इतर दिवशीही सीताफळे विक्रीस येत आहेत. मात्र, येथे प्रक्रिया उद्योग नसल्याने ती कवडीमोल दरात विक्री होत आहेत.

ठळक मुद्दे बालाघाटाच्या डोंगरामध्ये नैसर्गिकरित्या उगवलेल्या झाडांपासून सीताफळाचे उत्पादन मिळते. सीताफळाच्या व्यवसायातून दरवर्षी ४० ते ५० लाखांची उलाढाल होते. तालुक्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उसतोड कामगार स्थलांतर करतात. सीताफळ प्रक्रिया उद्योग उभा राहिल्यास हे स्थलांतर थांबू शकेल. 

- अनिल महाजन

धारूर (बीड) : बालाघाटाच्या डोंगरामध्ये नैसर्गिकरित्या उगवलेल्या झाडांपासून सीताफळाचे उत्पादन मिळते. मागील २० दिवसांपासून सीताफळे बहरात आले आहेत. धारूर येथील आठवडी बाजार तसेच इतर दिवशीही सीताफळे विक्रीस येत आहेत. मात्र, येथे प्रक्रिया उद्योग नसल्याने ती कवडीमोल दरात विक्री होत आहेत.

तालुक्यातील जमीन हलक्या प्रतीची व मुरमाड आहे. या जमिनीत नैसर्गिकरीत्या उगवलेली सीताफळांची खुरटी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. कसल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर केला जात नसल्याने ही सीताफळे सेंद्रीय प्रकारात मोडतात. चवीला मधुर व रसाळ असल्याने या सीताफळांना राज्याबाहेरही मागणी असते.  या वर्षी पावसामुळे सीताफळे चांगली पोसली आहेत.

तालुक्यात ६ हजार ६०० हेक्टर जमीन वनविभागाच्या ताब्यात आहे. बहुतांश जमीन डोंगराळ असल्याने मोठया प्रमाणात सीताफळांची झाडे आहेत . या जमिनीत वनविभागामार्फत दरवर्षी सीताफळांच्या झाडांची लागवड करण्यात येते. वनजमिनीतून मिळणा-या सीताफळांचा दरवर्षी लिलाव करण्यात येतो. यातून ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न वनविभागाला मिळते.या वर्षी काही खंडानंतर पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. यामुळे सीताफळे चांगली पोसली आहेत. मागील २० दिवसांपासून महिला मजूर, सुटी असल्याने शाळकरी मुले सीताफळांची तोडणी करुन आठवडी बाजारात विक्रीस आणू लागले आहेत. 

व्यापारी टोपलीवर भाव ठरवून खरेदी करतात. एका टोपलीतून " १५० ते २०० मिळतात. एक विक्रेता दिवसातून दोन टोपलीच्या जवळपास   सीताफळे विक्री करतात. परिसरातील काही व्यापारी  सीताफळांची कवडीमोल किंमतीत खरेदी करतात व नंतर इतर बाजारात पाठवितात. सीताफळ तोडणीपासून तीन ते चार दिवसात खाण्यायोग्य होते. नंतर ते खराब होत असल्याने त्याची साठवणूक करता येत नाही. खरेदी केलेली सीताफळे टेम्पोच्या सहाय्याने औरंगाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर तसेच गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद इ.  ठिकाणी विक्रीस नेतात. सीताफळाच्या व्यवसायातून दरवर्षी ४० ते ५० लाखांची उलाढाल होते.

राजकीय नेतृत्वाच्या अभावाने प्रश्न रखडला - साधारणत: पावसाळ्याच्या सुरुवातीला जून-जुलै महिन्यात पानगळ झाल्यास सीताफळांच्या झाडांना कळ्या लागण्यास सुरुवात होते.- पावसाळ्याच्या कालावधीत चांगला पाऊस झाल्यास सीताफळे लवकर पोसली जातात.- सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात सीताफळे परिपक्व होतात. सीताफळ कळ्या येण्यापासून तोडणीपर्यंत चार महिन्यांचा कालावधी लागतो.- धारूर येथे सीताफळावर प्रक्रिया उद्योग व्हावा अशी अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी आहे. परंतु प्रभावी राजकीय नेतृत्त्वाअभावी हा प्रश्न कायमस्वरूपी सखडलेला आहे.- तालुक्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उसतोड कामगार  स्थलांतर करतात. सीताफळ प्रक्रिया उद्योग उभा राहिल्यास हे स्थलांतर थांबू शकेल. - येथील सीताफळास जी. आय. मानांकन ही मिळालेले आहे. प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीची गरज आहे.