शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:38 IST

बीड : राज्यातील डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषदा, नगर पंचायती व नवनिर्मित नगर ...

बीड : राज्यातील डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषदा, नगर पंचायती व नवनिर्मित नगर परिषदा, नगरपंचायतींची प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी दिले आहेत. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांधील प्रभाग रचना करण्याचे काम नगर रचना विभागाकडून हाती घेण्यात आले आहेत. तर, पाच शहरात प्रभागरचना पूर्ण झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली. डिसेंबरअखेर नगरपंचायत व नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगरपालिका व नगरपंचायतांची मुदत संपत आहे. अशा मुदत संपणाऱ्या नगर परिषदा, नगरपंचायतींची व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना वेळेवर अंतिम करणे सुकर व्हावे म्हणून प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरू करणे आवश्यक आहे. शासनाने १२ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०२० अन्वये सर्व नगर परिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल.

तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेली लोकसंख्येची अलीकडची आकडेवारी म्हणजेच सन २०११ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे. त्यानुसार सदस्य संख्या निश्चित करून तितक्या प्रभागांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्यात यावा. परिस्थिती लक्षात घेता प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेता व निवडणुका मुदत समाप्तीपूर्वी पार पाडणे शक्य व्हावे, यासाठी सध्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. सदर कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही ही २३ ऑगस्टपासून सुरू करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. कच्चा आरखडा तयार होताच आयोगाला तत्काळ सादर करावे, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, केज व वडवणी येथील प्रभागरचना तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर, बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई व धारूर या शहरातील लोकसंख्येनुसार प्रभागरचना तयार करण्यात येणार असून, सर्व अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे.

राजकीय पक्ष लागले कामाला

जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगर परिषदा व नगरपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्व पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार का वेगवगळ्या याबद्दल अद्याप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तर, अनेक ठिकाणी राज्यात युती असली तरी, स्थानिक पातळीवर स्वबळाचा नारा दिला जात असल्यामुळे नेत्यांची डोकेदुखीदेखील वाढली आहे.