रुग्णसंख्येचा वेग मंदावला; पण मृत्युसत्र थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:26+5:302021-06-01T04:25:26+5:30
जिल्ह्यातील ४ हजार २०० संशयितांची रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली. यात ५१६ नवे रुग्ण निष्पन्न झाले, तर ३ हजार ...

रुग्णसंख्येचा वेग मंदावला; पण मृत्युसत्र थांबेना
जिल्ह्यातील ४ हजार २०० संशयितांची रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली. यात ५१६ नवे रुग्ण निष्पन्न झाले, तर ३ हजार ६८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाईचे १८, आष्टी ५७, बीड २१८, धारुर १४, गेवराई ४९, केज २२, माजलगाव २६, परळी ६, पाटोदा ५८, शिरुर २६ आणि वडवणी तालुक्यातील २२ जणांचा समावेश आहे. दिवसभरात ७५६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
दरम्यान, मागील २४ तासात जिल्ह्यात १४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये कोळपिंप्री (ता. धारुर) येथील ६४ वर्षीय पुरुष, डिग्रस (ता. परळी) येथील ८५ वर्षीय पुरुष, हिवरापहाडी (ता. बीड) येथील २० वर्षीय पुरुष, मांडवा (ता. परळी) येथील ६० वर्षीय पुरुष, पिंप्री (ता. बीड) येथील ६० वर्षीय पुरुष, गुरुवारपेठ अंबाजोगाई येथील ५७ वर्षीय पुरुष, जानेगाव (ता. केज) येथील ६२ वर्षीय पुरुष, तांबवा (ता. केज) येथील ९० वर्षीय पुरुष, टाकरवण (ता. माजलगाव) येथील ५० वर्षीय महिला, बीड शहरातील ६७ वर्षीय महिला, आष्टी शहरातील ६० वर्षीय महिला, परळी शहरातील ४५ वर्षीय पुरुष, केज येथील ५५ वर्षीय पुरुष व माऊलीनगर बीड येथील ६४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८६ हजार ५७१ इतकी झाली आहे. पैकी ७९ हजार ८४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आतापर्यंत १९७७ जणांचा बळी गेला आहे. सध्या ४ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जि. प. सीइओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.