आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. ...
आष्टी पोलिसांच्या ताब्यातून अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केले. त्यानंतर पीडितेने आपल्याला या आरोपीपासून धोका असून संरक्षण देण्याची मागणी केली होती. एवढे गंभीर प्रकरण असतानाही आष्टी पोलिसांकडून अद्यापही पीडितेला संरक्षण देण्यात आलेले नाही. ...
जिल्ह्यातील खरीप व रबी हंगामातील चारा पिकांच्या टक्केवारीत मागील १० वर्षात ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून बीड जिल्हा औरंगाबाद विभागात अव्वल आला आहे. मागील पाच वर्षापासून प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवली आहे. ...
शुक्रवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठे नुकसान झाले. तर माजलगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विजेच्या तारांवर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात तारा तुटल्या त्यामुळे तालुक्याचा वीजपुरवठा २४ तासांपासून खंडित झालेला आहे. ...