महायुतीबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असून प्राथमिक चर्चा झालेली आहे. शिवसंग्रामने राज्यात १२ जागांची मागणी केली असून यात बीडचाही समावेश आहे. बीडची जागा शिवसंग्रामलाच मिळेल, असा विश्वास युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी व्यक्त केला. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये बीड शहर हागणदारीमुक्त करून स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. पालिकेने सर्व सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी बल्ब, पाण्याची टाकी, तोट्या, आरसे व इतर साहित्य बसवून ते सुविधायुक्त केले. ...
जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता खरिप हंगामातील कडधान्य व बहूतांश ठिकाणी सोयाबीन हे पिक वाया गेले आहे. या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. ...
ऊसतोडणी कामगारांनी संघटीत होऊन संघर्ष केल्याशिवाय त्यांचे काहीच कल्याण होणार नाही. कामगारांनी ढोंगी नेतृत्व झुगारून लाल झेंड्याच्या नेतृत्वाखाली लढा उभारावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र उसतोडणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. दत्ता डाके यांनी केले. ...
जिल्ह्यात यंदाही पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे वातावरण होते. मागील दोन तीन दिवसांत सौम्य स्वरुपाच्या पावसामुळे दिलासा मिळत असला तरी मागील दोन वर्षांतील पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यात कोरड्या दिवसांचे प्रमाण सारखेच २७ इतके आहे. ...
शहागड, गेवराई, चौसाळा अशी हायड्रेंड योजना सुरु करावी, सुशिक्षित बेरोजगारांना निधी मर्यादा ओलांडून मिळणारी कामे तसेच जिल्हा परिषदेच्या जागेत पुतळे उभारणीच्या विषयांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राष्टÑीय पातळीवर स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा तसेच इतर उपक्रम सुरु आहेत. या अभियानांतर्गत गावपातळीवर करावयाच्या उपाय योेजनेबाबत घेण्यात आलेल्या कार्यशाळेकडे पाठ फिरविणाऱ्या ८ गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला अस ...
सरकारी रुग्णालयात रजा टाकून खाजगी सराव जोमात करणाऱ्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावली आहे. ...