शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

पॅकेजमध्ये बारा बलुतेदार, अठरा आलुतेदारांचा समावेश करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:31 IST

अंबाजोगाई : कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमुळे गतवर्षी बेरोजगार झालेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली.या काळात गावगाडा हाकणा-या बारा बलुतेदार व आठरा ...

अंबाजोगाई :

कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमुळे गतवर्षी बेरोजगार झालेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली.या काळात गावगाडा हाकणा-या बारा बलुतेदार व आठरा आलुतेदारांचेही प्रचंड हाल झाले.या वर्गाकडे केंद्र सरकारने आणि समाज व्यवस्थेनेही लक्ष दिले नाही .केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजपासून हा वर्ग तर कोसोदूर राहिलेला आहे. त्यामुळेच या वर्गावर बिकट परिस्थिती ओढवू नये म्हणून लॉकडाऊन पार्श्वभूमीवर देण्यात येणा-या आर्थिक पॅकेजमध्ये बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार बांधवांचा समावेश करावा अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली आहे.

बारा बलुतेदारांमध्ये कुंभार,कोळी,गुरव, चांभार,मातंग,तेली, न्हावी,परीट,माळी, महार,लोहार,सुतार या वर्गांचा समावेश होता. हिंदूंप्रमाणे मुस्लिमांमध्येही बारा बलुतेदारांचा अंतर्भाव होता. त्यात आतार, कुरेशी,छप्परबंद, तांबोळी,पिंजारी- नदाफ,फकीर, बागवान,मदारी,मन्यार,मोमीन, मिसगर,शिकलगार आदी बारा जातींचा समावेश आहे. लॉकडाऊननंतर बाजारपेठा हळूहळू सुरू होतील.मात्र,रोटीच बंद झालेल्या गावगाडा हाकणा-या बारा बलुतेदारांच्या घरच्या चुलीचा खरा प्रश्न आहे.

बलुतेदारांपैकी शहरात आणि गाव खेड्यातील साळी,माळी,तेली, कुंभार,न्हावी,चांभार,शिंपी,सोनार,भोई, कोळी,रंगारी,धोबी, सुतार,लोहार,गवंडी या पारंपारिक व्यावसायिकांची दैना उडाली.विशेषतः हातावर पोट भरणा-या आहे.बलुतेदारांपैकी न्हावी,भोई,शिंपी, चांभार,परीट यांना मोठा फटका बसला आहे. सलुन व्यावसायिक,टेलरींग कारागीर,परीट,सुतार,लोहार,टोपली, केरसुणी तयार करून गावोगावी विक्री करणारे मातंग बांधव,चप्पल-बुट सांधणारे गटई कामगार,खारीमुरी-फुटाणे विकणारा भोई समाज,कोळी,कुंभार, सुवर्ण कारागीर आणि गावोगाव फिरून फुले जमवून हार आणि गुच्छ बनविणारे माळी बांधव,मंदिराची देखभाल करणारे गुरव बांधव,फळे विकून उपजिविका करणारे बागवान,गावोगावी -गल्ली बोळात बांगड्या विकणारे मनियार,गाद्या,दुलई तयार करणारे पिंजारी,यंत्रमागावर विणकाम करणारे जुलाहा (साळी) बांधवांचे लॉकडाऊनने अक्षरश: कंबरडेच मोडले आहे.आर्थिक पॅकेज देताना रोटी बरोबरच या सर्वांच्या रोजीचाही एकत्रित विचार व्हावा, अशी मागणी मोदी यांनी केली आहे.