शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण उभारणीसाठी बांबू लागवड काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST

गेवराई : इंधन माणसांची सवत बनून जगात अवतरले असून त्यामुळे निसर्गचक्र पार बिघडले आहे. म्हणून या पुढे सकल मानव ...

गेवराई : इंधन माणसांची सवत बनून जगात अवतरले असून त्यामुळे निसर्गचक्र पार बिघडले आहे. म्हणून या पुढे सकल मानव जातीने स्वत:ला आणि भावी पिढीला वाचविण्यासाठी पर्यावरणाच्या उभारणीसाठी नव्याने सुरुवात करून बांबूची लागवड करावी, असे आवाहन माजी आमदार पाशा पटेल यांनी येथे केले. शनिवारी येथील कृषी कार्यालयातील बैठकीत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दिलीप गोरे,कृषी अधिकारी हर्षवर्धन खेडकर, दत्ता जाधव, अनिल जरांगे, किरण बांगर , सचिन पवार, कृषी सहायक चव्हाण, करांडे, संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पाशा पटेल म्हणाले, १ जानेवारी रोजी पाटोदा तालुक्यातील गवळवाडीत अकरा झाडे लावून गोमा खोरे (गोदावरी- मांजरा) पुनर्जीवन प्रकल्पाची सुरुवात केली आहे. आजकाल झाडांची संख्या कमी आणि इंजिन जास्त झाल्यामुळे प्रदूषण वाढत आहे. यामुळे गारपीट, महामारीसारख्या घटना घडत आहे. निसर्गाचे संतुलन राखण्याची गरज आहे. सध्या कुठल्याच ऋतूनुसार निसर्ग चालत नाही. म्हणून आज पर्यावरण रक्षणाची गरज असल्याचे पटेल म्हणाले.

पर्यावरणपूरक बांबू पीक

आता कार्बन खाणाऱ्या झाडाची लागवड करावी लागेल. यामध्ये बांबू हाच एक पर्याय आसल्याचे त्यांनी सांगितले. एक बांबू वर्षाला ३२० किलोपेक्षा जास्त ऑक्सिजन देत आहे. ३० टक्के अधिकचे कार्बन खात असल्याने,पर्यावरणपूरक म्हणून बांबू पीक आवश्यक आहे. बांबू एकरी लाख रुपये उत्पन्न देत असून ते शेती आणि शेतकऱ्यांना परवडणारे आहे.

चळवळ हाती घेतली

बांबूपासून इथेनॉल, सीएनजी, कापड, फर्निचर, बिस्कीट, लोणचे, इंटेरिअर डिझाईन तसेच यानातील तापमान रोधक म्हणून उपयोगात येणार आहे. यासाठी आम्ही ही चळवळ सुरू केली असून गोदावरी व मांजरा नदीच्या माध्यमातून गोमा प्रकल्प चालू केला आहे. यातून मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करणार असल्याचे पाशा पटेल म्हणाले.