शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

पर्यावरण उभारणीसाठी बांबू लागवड काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST

गेवराई : इंधन माणसांची सवत बनून जगात अवतरले असून त्यामुळे निसर्गचक्र पार बिघडले आहे. म्हणून या पुढे सकल मानव ...

गेवराई : इंधन माणसांची सवत बनून जगात अवतरले असून त्यामुळे निसर्गचक्र पार बिघडले आहे. म्हणून या पुढे सकल मानव जातीने स्वत:ला आणि भावी पिढीला वाचविण्यासाठी पर्यावरणाच्या उभारणीसाठी नव्याने सुरुवात करून बांबूची लागवड करावी, असे आवाहन माजी आमदार पाशा पटेल यांनी येथे केले. शनिवारी येथील कृषी कार्यालयातील बैठकीत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दिलीप गोरे,कृषी अधिकारी हर्षवर्धन खेडकर, दत्ता जाधव, अनिल जरांगे, किरण बांगर , सचिन पवार, कृषी सहायक चव्हाण, करांडे, संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पाशा पटेल म्हणाले, १ जानेवारी रोजी पाटोदा तालुक्यातील गवळवाडीत अकरा झाडे लावून गोमा खोरे (गोदावरी- मांजरा) पुनर्जीवन प्रकल्पाची सुरुवात केली आहे. आजकाल झाडांची संख्या कमी आणि इंजिन जास्त झाल्यामुळे प्रदूषण वाढत आहे. यामुळे गारपीट, महामारीसारख्या घटना घडत आहे. निसर्गाचे संतुलन राखण्याची गरज आहे. सध्या कुठल्याच ऋतूनुसार निसर्ग चालत नाही. म्हणून आज पर्यावरण रक्षणाची गरज असल्याचे पटेल म्हणाले.

पर्यावरणपूरक बांबू पीक

आता कार्बन खाणाऱ्या झाडाची लागवड करावी लागेल. यामध्ये बांबू हाच एक पर्याय आसल्याचे त्यांनी सांगितले. एक बांबू वर्षाला ३२० किलोपेक्षा जास्त ऑक्सिजन देत आहे. ३० टक्के अधिकचे कार्बन खात असल्याने,पर्यावरणपूरक म्हणून बांबू पीक आवश्यक आहे. बांबू एकरी लाख रुपये उत्पन्न देत असून ते शेती आणि शेतकऱ्यांना परवडणारे आहे.

चळवळ हाती घेतली

बांबूपासून इथेनॉल, सीएनजी, कापड, फर्निचर, बिस्कीट, लोणचे, इंटेरिअर डिझाईन तसेच यानातील तापमान रोधक म्हणून उपयोगात येणार आहे. यासाठी आम्ही ही चळवळ सुरू केली असून गोदावरी व मांजरा नदीच्या माध्यमातून गोमा प्रकल्प चालू केला आहे. यातून मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करणार असल्याचे पाशा पटेल म्हणाले.