शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

राष्टहिताविरुद्ध वागणाऱ्यांना काय शिक्षा द्याल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:34 AM

जर कुणी राष्टÑहिताच्या विरुद्ध वागत असेल तर आपण त्यांना काय शिक्षा द्याल, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत उपस्थितांना केला.

ठळक मुद्देपरळीत प्रचार सभा : नरेंद्र मोदी यांचा जनतेला सवाल; २०२२ पर्यंत शुद्ध पेयजल देण्याची ग्वाही

परळी (जि.बीड) : ३७० कलम रद्द करणे हा विषय आमच्यासाठी राजनीतीचा नसून देशभक्तीचा, राष्टÑहिताचा आहे. ही देशभावना आहे. त्यासाठी सर्वांनीच राष्टÑहित जोपासले पाहिजे. जर कुणी राष्टÑहिताच्या विरुद्ध वागत असेल तर आपण त्यांना काय शिक्षा द्याल, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत उपस्थितांना केला. मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करून २०२२ पर्यंत सर्वांना शुद्ध पेयजल पुरविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.बीड जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी यांची गुरुवारी सकाळी वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील जागेत जाहीर सभा घेण्यात आली. व्यासपीठावर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, उमेदवार जयदत्त क्षीरसागर, रमेश आडसकर, नमिता मुंदडा, आ. सुरेश धस यांच्यासह बीड जिल्ह्यातील युतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.‘भारत माता की जय, जय शिव शंभो ’ अशी मोदी यांनी भाषणाची सुरु वात केली. बाबा वैद्यनाथांच्या पावनभूमीत व गोपीनाथ मुंडे यांच्या कर्मभूमीत, संतांच्या भूमीत आलो असल्याचे सांगून मोदी यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, आज मला दोन बाबांचे म्हणजे बाबा वैद्यनाथ आणि समोर असलेल्या विशाल जनताजनार्दनाचे दर्शन घडले. मी सोमनाथांच्या भूमीतला. काशी विश्वनाथांपासून ते बाबा वैद्यनाथांपर्यत सर्व महादेवांची आमच्यावर कृपा आहे. गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन हे माझे मित्र. आज ते हयात नसले तरी त्यांचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या पाठीशी आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंकजा यांचे कार्य प्रशंसनीय आहे. बीड जिल्ह्याने मागील निवडणुकीत अनमोल साथ दिली. या निवडणुकीत विक्रमी विजय होईल. मराठवाड्यात पाण्याचे संकट आहे. दुष्काळ हटविण्यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. २०२२ पर्यंत घराघरात शुद्ध पाणी शासन पुरविणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होत आहे. विविध ४०० योजनांचे साडेआठ लाख करोड रु पये लाभार्थीच्या खात्यात जमा शासन करीत आहे. थेट पैसे मिळत असल्यामुळे ढापाढापी होत नाही. सरकारने गरिबांना मोफत उपचार, घर, वीज, गॅस सिलेंडर दिले आहे. केंद्र्र सरकार जल जीवन मिशन योजनेअंतर्गत येणाºया पाच वर्षात घराघरात पाणी पोहोचविणार आहे. पाण्यासाठी साडेतीन लाख कोटी रु पये खर्च केले जाणार आहेत, अशी माहितीही नरेंद्र मोदी यांनी दिली. गोपीनाथराव मुंडे यांचे परळी- बीड -नगर रेल्वेचे व ऊसतोड कामगार महामंडळाचे स्वप्न पूर्ण होत आहे. वॉटर ग्रीड प्रकल्पामुळे वाहून जाणारे पाणी वळविण्यात येत आहे. यामुळे बीड जिल्ह्यात उद्योग येऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील, असे ते म्हणाले.लोकशाहीचा उत्सव दिवाळीसारखा साजरा करानिवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. तो दिवाळीसारखा साजरा करा. दोन दिवस सुटी आली असली तरीही वाजतगाजत मतदान करा, आपला पवित्र हक्क बजावा. हा योग कधी तरी येत असतो, असे मोदी म्हणाले.महिलांनो, पुरुषांपेक्षा जास्त मतदान करा !या सभेस महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यात महिला बचत गटांचाही समावेश होता. बचत गटांच्या कार्याची मोदी यांनी प्रशंसा केली. यापूर्वी महिलांच्या मतदानाचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी होते. लोकसभेला बरोबरीत आले आणि आता या निवडणुकीत पुरुषांपेक्षा जास्त मतदान झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी महिलांना केले. महिलांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांच्याकडून वदवून घेतले. या मतदानाच्या आकडेवारीची माहिती मी मागवून घेईन, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीNarendra Modiनरेंद्र मोदीPankaja Mundeपंकजा मुंडे