शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बालग्राममधील ९० मुला- मुलींची आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 07:20 IST

येथील मुलांनी आई- बाबा म्हणून आम्हाला स्वीकारलं हाच आमचा सर्वोच्च पुरस्कार आहे

- अनिल भंडारी

बीड : दोन वर्षांपूर्वी बालग्राममधील मुला-मुलींनी आम्हाला जवळ बोलावलं. ‘आम्ही तुम्हाला आई- बाबा म्हणालो तर चालेल का? हा त्यांचा प्रश्न ऐकून  सुखद धक्का बसला. आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, पुढे मिळतीलही. पण येथील मुलांनी आई- बाबा म्हणून आम्हाला स्वीकारलं हाच आमचा सर्वोच्च पुरस्कार आहे... बालग्रामची ‘आई’  प्रीती संतोष गर्जे सांगत होत्या...

बहिणीच्या मृत्यूनंतर पोरकी झालेल्या भाची ऋतुजाकडे पाहून संतोषने २००४ मध्ये गेवराईजवळ  सहारा अनाथालय ‘बालग्राम’ सुरू केले. आई वडिलांचे छत्र हरवलेली, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या बापाची, रेडलाईट एरियात काम करणाऱ्या मातांची आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे उद्ध्वस्त आयुष्य सावरण्याचे काम इथे चालते. येथील ९० मुला- मुलींची आई असलेल्या प्रीती स्वत:चा प्रवास सांगताना म्हणाल्या, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे  ‘चलो युवा कुछ कर दिखाएं’ या शिबिरात संतोषची मुलाखत ऐकून ‘हा तरुण निराधार ६० मुलांना कसं सांभाळत असेल’ असा विचार करत मी थक्क झाले आणि तिथेच संतोषसोबत काम करण्याचा निश्चय केला.

२०११ मध्ये विवाह झाला. काय काम करावे लागेल, कसं करायचं?  ते झेपणार का? अशा अनेक प्रश्नांचे काहूर मनात होते. मात्र माझी ‘आई’ डोळ्यांसमोर होती. त्यामुळे बालग्राममध्ये एकरूप होताना सुलभ झालं. आई- वडील नसण्याचं दु:ख इथे आल्यावर समजलं. या मुलांच्या भावविश्वात मी माझी जागा शोधत होते. त्यांनाही मी त्यांची मैत्रीण, मोठी ताई वाटू लागली.  स्वयंपाक, अंघोळ, मुला- मुलींना सोबत घेऊन खरेदी  व त्यांच्या आजारपणात लक्ष दिल्याने जिव्हाळ्याचे नाते फुलत गेले. बालग्राममध्ये रक्तापलीकडचे नाते सांभाळताना होणारा आनंद माझ्यासाठी ऊर्जा देणारा असल्याचे प्रीती सांगतात. 

दिवाळी आली की,  कपडे, फराळ, फटाक्यांची चर्चा मुले माझ्याशी करतात.  पहाटेपासून मुलांना उटणं लावताना सकाळ कधी होऊन जाते कळतही नाही. माझी आई जशी करायची, तशी मी इथे सगळं करते.  मुलेच मेनू ठरवतात आणि माझ्यासोबत  मुली, मावशी स्वयंपाक करतात. आई होणं काय असतं हे आई होतानाच कळते. आई होणं सोपं नसतं. तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. या मुलांची मैत्रीण, मोठी ताई म्हणून जबाबदारी पार पाडत असल्याची प्रांजळ भावना प्रीती यांनी व्यक्त केली. 

कधी भेटू आणि कधी नाही असे वाटते...एक मुलगी भाकर बनवायला शिकत होती.  भाकर चांगली झाल्याचे लक्षात येताच एखादा पुरस्कार मिळाल्यानंतरच्या आनंदाप्रमाणे  हातावर भाकर घेत ती माझ्याकडे धावत आली, हा माझ्यासाठी सुखद क्षण होता. शाळेत बक्षीस मिळाले, कौतुक झाले की मला कधी भेटू आणि कधी नाही, असे या मुलांना वाटते. शाळेतून आल्यानंतर मुलं आधी पळत येतात, दिवसभरातील रिपोर्टिंग करतात, हे सांगताना प्रीती यांना भरुन आले.  

मायेने दोन दिवसांत त्याचा आजार पळवून लावलामुलांना आजार कळत नसतात. अगदी १०२, १०४ डिग्री तापातही ते अंगावर दुखणे काढतात. एक मुलगी नेहमी झोपून रहायची, तिचे हिमोग्लोबीन कमी झाल्याचे कळले. ते आजार लपवतात. त्यामुळे बारकाईने लक्ष देत त्यांच्यासोबत राहून स्पर्शाने काळजी घेते. मुलासकट घरातून हाकलल्यानंतर सासर व माहेर नसलेल्या आईने  साडेतीन वर्षांच्या एका मुलाला ‘बालग्राम’मध्ये दाखल केले. त्याला ताप आला. आई- आई म्हणून रडत होता. आई होती, पण त्याच्याजवळ नव्हती. मायेने सांभाळ करत दोन दिवसांत त्याचा आजार पळवून लावल्याचा अनुभव प्रीती यांनी कथन केला.  

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेBeedबीडSocialसामाजिक