शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:31 IST

माजलगाव : येथील माजलगाव धरणाची पाणीपातळी चांगलीच खालावली असून, बुधवारी ही पाणीपातळी ४५ टक्यांपर्यत खालावली आहे. सध्या कडक उन्हाळा ...

माजलगाव : येथील माजलगाव धरणाची पाणीपातळी चांगलीच खालावली असून, बुधवारी ही पाणीपातळी ४५ टक्यांपर्यत खालावली आहे. सध्या कडक उन्हाळा जाणवू लागला असून, धरणातून पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा चालू आहे. तर कालव्याद्वारे आणखी पाणीपाळ्या शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत धरणाची पाणीपातळी चांगलीच खालावणार असल्याने बीड, माजलगावसह अनेक गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

मागीलवर्षी परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावून सप्टेंबर महिन्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. धरण परिसरात सप्टेंबरनंतरही पाऊस पडत राहिल्याने या धरणातून दीड ते दोन महिने पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांना आनंद निर्माण झाला होता व मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली होती.

माजलगाव धरणावरील भागात शेतकऱ्यांकडून पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू आहे, तर सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पिभवन होताना दिसत आहे. त्याचबरोबर धरणाखालील भागात असलेल्या शेतकऱ्यांसाठी कालवा व चारीद्वारे आतापर्यंत चार पाणीपाळ्या सोडण्यात आल्या असून, पाचवी पाणीपाळी सध्या सुरू आहे. तर मे व जून महिन्यात शेतकऱ्यांसाठी आणखी तीन पाणीपाळ्या देण्यात येणार असल्याची माहिती धरणाची अभियंता बी. आर .शेख यांनी दिली.

माजलगाव धरण हे ४३१.८० मीटर पाणीपातळी झाल्यास पूर्ण क्षमतेने भरते. या धरणाची पाणीपातळी २.५६ मीटरने कमी होऊन बुधवारी दुपारी दोन वाजता एकूण पाणीसाठा ४२९.२४० मीटरएवढा झाला होता.

उपयुक्त पाणीसाठा हा २८१.४० दलघमी एवढा झाला, तर धरणाच्या पाण्याची टक्केवारी ही ४४.६८ टक्के झाल्याची माहिती बी. आर. शेख यांनी दिली.

या धरणाची पाणीपातळी मोठया प्रमाणात खालावली असून, एप्रिलचा निम्मा व मे महिना पूर्ण जाणार असून, जूनमध्ये वेळेवर पाऊस न पडल्यास बीड व माजलगाव शहरासह १५-२० गावांचा पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.

===Photopath===

140421\img_20210403_104828_14.jpg