शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

माजलगाव धरण १२ टक्क्यांवर; १५ दिवसात १ मीटरने पाणी पातळी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 6:01 PM

बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत

ठळक मुद्देशेतकरी वर्गात आनंद

माजलगाव (बीड ) : मागील पधरवाड्यात झालेला दमदार पाऊस तसेच धरण परिसरात सोमवारी  सायंकाळी  झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्यात मोठी वाढ झाली. मंगळवारी दुपारपर्यंत धरणाची पाणी पातळी १२ टक्के झाल्याने बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार असून शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.  

अनेक वेळा परतीच्या पावसाने मृत साठयात असलेले हे धरण पूर्ण भरले आहे. मागील १५ दिवसात परतीचा दमदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ पहावयास मिळाली. ७ ऑक्टोबर रोजी हे धरण मृत साठयातुन बाहेर पडले. यावेळी या धरणात ४२६.११ मीटर एवढा पाणी साठा झाला होता. मंगळवारी दुपारी या धरणात ४२६.५६  मीटर पाणी पातळी होती  व एकूण पाणीसाठा हा १५८  दलघमी एवढा होता तर ५.२६ टक्के एवठा पाणी साठा उपलब्ध होता. २४ तासात पाणी पातळीत वाढ होऊन ती ४२७.१०  मीटर झाली होती तर धरणात एकूण पाणीसाठा १८०  दलघमी झाला. यामुळे टक्केवारीत वाढ होऊन १२.१८  झाली आहे. परतीच्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गेल्यावर्षी पावसाळा संपला तेव्हा धरणात एकूण १२६.१० दलघमी पाणी साठा होता. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.  

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणRainपाऊसWaterपाणीBeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरण