शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
3
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
4
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
5
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
6
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
7
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
8
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
9
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
10
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
11
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
12
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
13
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
14
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
15
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
16
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
17
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
18
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
19
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
20
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्र सरकार झोपलेले आहे'; शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीवरुन सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:54 IST

'फडणवीसांच्या बॅनरसाठी पैसा कुठून येतो?'; सुजात आंबेडकरांचा तुटपुंज्या मदतीवरून सरकारला थेट सवाल

परळी ( बीड) : मराठवाड्यासह राज्यातील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मदत 'अपमानास्पद' असल्याची जोरदार टीका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली आहे. राज्य सरकारकडे तिजोरी रिकामी असल्याचे कारण सांगितले जात असताना, मुख्यमंत्री (उपमुख्यमंत्री) देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर संपूर्ण महाराष्ट्रात लावण्यासाठी पैसा कुठून येतो, असा थेट आणि सणसणीत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सोमवारी सायंकाळी परळी शहरातील पंचवटी नगर येथील श्रद्धा मंगल कार्यालयात आयोजित एल्गार महासभेत ते बोलत होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव प्रा. किसन चव्हाण, राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद, जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे,  परळी शहराध्यक्ष गौतम आगळे, तालुकाध्यक्ष राजेश सरवदे, प्रसन्नजीत रोडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सुजात आंबेडकर यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारच्या मदतीची तुलना पंजाब सरकारशी केली. "पंजाब सरकारने ज्या शेतकऱ्यांची शेती पाण्यात गेली, त्यांना हेक्टरी ८० हजार रुपयांची मदत केली आहे. तर महाराष्ट्र शासनाने केवळ ८,५०० रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. मंत्री शेतकऱ्यांना भेटायला आले का? नाही. याचा अर्थ महाराष्ट्र शासन झोपलेले आहे," अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.

बॅनरचा पैसा शेतकऱ्यांसाठी वापराशेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना, सरकारने अपमानास्पद मदत जाहीर केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी मागणी केली की, सरकारने तातडीने सावकारांनी आणि फायनान्सवाल्यांनी शेतकरी-कष्टकऱ्यांची वसुली थांबवावी आणि पूर्ण कर्ज माफ करावे. तसेच, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात राबविलेला मदतीचा पॅटर्न राज्य सरकारने अमलात आणून, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीने १५ हजार रुपये आर्थिक मदत करावी आणि पंचनाम्यानंतर पुन्हा वेगळी वाढीव मदत द्यावी.

पाटबंधारे विभागावर गंभीर आरोपअतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमागे सरकारच्या धोरणांचा दोष असल्याचे सांगत सुजात आंबेडकर म्हणाले, "शासनाने ठिकठिकाणी छोटे छोटे धरणे बांधली असती तर आज पूरपरिस्थिती उद्भवली नसती. पण मोठे धरण बांधून पाटबंधारे विभागाला जास्त पैसा कमवायचा होता, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra government asleep: Sujat Ambedkar slams meager farmer aid.

Web Summary : Sujat Ambedkar criticized Maharashtra's farmer aid as insulting compared to Punjab's. He demanded immediate debt relief, a 15,000-rupee grant, and accused the government of prioritizing large dams for profit, causing floods.
टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBeedबीड