शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

'महाराष्ट्र सरकार झोपलेले आहे'; शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीवरुन सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:54 IST

'फडणवीसांच्या बॅनरसाठी पैसा कुठून येतो?'; सुजात आंबेडकरांचा तुटपुंज्या मदतीवरून सरकारला थेट सवाल

परळी ( बीड) : मराठवाड्यासह राज्यातील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मदत 'अपमानास्पद' असल्याची जोरदार टीका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली आहे. राज्य सरकारकडे तिजोरी रिकामी असल्याचे कारण सांगितले जात असताना, मुख्यमंत्री (उपमुख्यमंत्री) देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर संपूर्ण महाराष्ट्रात लावण्यासाठी पैसा कुठून येतो, असा थेट आणि सणसणीत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सोमवारी सायंकाळी परळी शहरातील पंचवटी नगर येथील श्रद्धा मंगल कार्यालयात आयोजित एल्गार महासभेत ते बोलत होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव प्रा. किसन चव्हाण, राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद, जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे,  परळी शहराध्यक्ष गौतम आगळे, तालुकाध्यक्ष राजेश सरवदे, प्रसन्नजीत रोडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सुजात आंबेडकर यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारच्या मदतीची तुलना पंजाब सरकारशी केली. "पंजाब सरकारने ज्या शेतकऱ्यांची शेती पाण्यात गेली, त्यांना हेक्टरी ८० हजार रुपयांची मदत केली आहे. तर महाराष्ट्र शासनाने केवळ ८,५०० रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. मंत्री शेतकऱ्यांना भेटायला आले का? नाही. याचा अर्थ महाराष्ट्र शासन झोपलेले आहे," अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.

बॅनरचा पैसा शेतकऱ्यांसाठी वापराशेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना, सरकारने अपमानास्पद मदत जाहीर केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी मागणी केली की, सरकारने तातडीने सावकारांनी आणि फायनान्सवाल्यांनी शेतकरी-कष्टकऱ्यांची वसुली थांबवावी आणि पूर्ण कर्ज माफ करावे. तसेच, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात राबविलेला मदतीचा पॅटर्न राज्य सरकारने अमलात आणून, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीने १५ हजार रुपये आर्थिक मदत करावी आणि पंचनाम्यानंतर पुन्हा वेगळी वाढीव मदत द्यावी.

पाटबंधारे विभागावर गंभीर आरोपअतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमागे सरकारच्या धोरणांचा दोष असल्याचे सांगत सुजात आंबेडकर म्हणाले, "शासनाने ठिकठिकाणी छोटे छोटे धरणे बांधली असती तर आज पूरपरिस्थिती उद्भवली नसती. पण मोठे धरण बांधून पाटबंधारे विभागाला जास्त पैसा कमवायचा होता, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra government asleep: Sujat Ambedkar slams meager farmer aid.

Web Summary : Sujat Ambedkar criticized Maharashtra's farmer aid as insulting compared to Punjab's. He demanded immediate debt relief, a 15,000-rupee grant, and accused the government of prioritizing large dams for profit, causing floods.
टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBeedबीड