शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कडा कृ. उ. बा समितीत सुविधांचा दुष्काळ; स्वच्छतागृह, पाणी, रस्ते, निवारा शेड नसल्याने कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:38 IST

कडा- ज्या कृ. उ. बा. समितीत जिल्हा, परजिल्हा या ठिकाणावरून आलेला माल महाराष्ट्रात नव्हे, तर परदेशात जातो. याच कृ. ...

कडा- ज्या कृ. उ. बा. समितीत जिल्हा, परजिल्हा या ठिकाणावरून आलेला माल महाराष्ट्रात नव्हे, तर परदेशात जातो. याच कृ. उ. बा. समितीत संचालक मंडळ व पणन महासंघाच्या दुर्लक्षपणामुळे या ठिकाणी कसलीच सुविधा मिळत नसल्याने मोठी कुचंबणा होत असल्याचे दिसून येत आहे.

कृ. उ. बा. समितीत त्वरित सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली.

आष्टी तालुक्यातील कडा येथे कृ. उ. बा. समिती आहे. याच बाजार समितीमध्ये जिल्हा व परजिल्हा या ठिकाणावरून शेतकरी आपला शेती माल विक्रीसाठी घेऊन येतात. महाराष्ट्रभर नावलौकिक असलेल्या बाजार समितीमध्ये आल्यावर शेतकऱ्यांना पश्चात्ताप झाल्याशिवाय राहत नाही.

या ठिकाणी शेतकरी शेती माल घेऊन आला, तर माल उघड्यावर ठेवावा लागतो. शेतकरी थकून आल्यावर आराम करण्यासाठी त्याला निवाराशेड नाही, स्वच्छतागृह नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, मुतारी नाही, त्याचबरोबर अंतर्गत सिमेंट रस्ते नसल्याने मातीचा फुफाटा मोठ्या प्रमाणावर आहे. संरक्षण भिंती, मुख्य गेटचे काम रखडल्याने मोकाट जनावरे त्रास देतात. अशा एक ना अनेक गैरसोयी व सुविधा नसल्याने शेतकरी लोकांची कुचंबणा होत आहे.

संचालक मंडळ व पणन महासंघाने याकडे दुर्लक्ष न करता ज्याच्या जिवावर ही बाजार समिती चालते. किमान त्यांना तरी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.

जनावरांसाठी असलेला पाण्याचा हौद कोरडेठाक

रविवारी या ठिकाणी आठवडी बाजार असतो. बाजारात गाय, बैल, म्हशी, शेळ्या ही जनावरे विक्रीसाठी लांबलांबून लोक आणतात. खरेदी करण्यासाठी देखील तेवढीच गर्दी असते, पण दिवसभर जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी हंबरडा फोडावा लागतो. घरी पाणी पाजून बाजारात आणले की परत घरी गेल्यावरच त्यांना पाणी मिळते. मग एवढ्या थाटामाटात बनवलेल्या हौदात थोडे देखील पाणी ठेवता येत नसल्याने मुक्या जिवाशी देखील खेळले जात असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहिलं जातं. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सुविधांपासून कोसो दूर असलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून संचालक मंडळाने लाखो रुपये खर्च करून कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालय बनवले. मग शेतकऱ्यांना सुविधा देताना दुजाभाव का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत कडा कृ.उ.बाजार समितीचे सचिव हनुमंत गळगटे यांना विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.