शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

१३६४ गावांसाठी जलजीवन मिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:34 IST

बीड : जिल्ह्यात जवळपास पावणे पाच लाख कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी नळाने पोहोचविण्यासाठी जलजीवन मिशन उपक्रमातून १३६४ गावांत ...

बीड : जिल्ह्यात जवळपास पावणे पाच लाख कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी नळाने पोहोचविण्यासाठी जलजीवन मिशन उपक्रमातून १३६४ गावांत मोठे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व नळजोडण्या पुढील चार वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे धोरण निश्चित झाले असून, त्याचाच पहिला टप्पा एक लाख नळजोडण्या देऊन पूर्ण केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. जलजीवन मिशन या केंद्र शासनाच्या उपक्रमात जिल्ह्यातील १३६४ गावांमध्ये पिण्याचे पाणी नळाने उपलब्ध करून देण्यासाठीची मोठी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील वाडी वस्ती तांडा या ठिकाणीदेखील नळाने पिण्याचे पाणी देण्याचे धोरण आखण्यात आलेले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून जीवन मिशन आराखडे तयार करण्याबाबत स्वच्छ भारत मिशन उपक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व आराखडे तयार झालेले आहेत.

अस्तित्वात असलेल्या नळयोजना तसेच ग्रामपंचायतीअंतर्गत कुटुंबांना दिलेल्या नळजोडण्या अधिकृत करून त्यांची नोंद ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ९ नोंदवहीमध्ये करण्याच्या सूचना यापूर्वीच ग्रामसेवकांना दिले आहेत.

अस्तित्वात असलेल्या नळजोडण्या तसेच अनधिकृत असलेल्या नळजोडण्या अधिकृत करून त्याची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करण्याची मोहीम जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांतर्गत घेण्यात आलेली आहे. या मोहिमेमध्ये एक लक्ष नळजोडणीची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात आलेली आहे.

मार्च २०२१ अखेर जिल्ह्यातील अंबाजोगाई व धारूर दोन तालुके १०० टक्के नलजोडणीसाठी उद्दिष्ट म्हणून घेण्यात आले होते. या दोन्ही तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त नळजोडणी झालेली आहे, तर उर्वरित गावांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठीचे आराखडे तयार झाले असून, या आराखड्याला मंजुरी मिळताच कामे पूर्ण होऊन योजनेचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल.

ग्रामीण पाणीपुरवठा पाच उपविभागाचे उपअभियंता तसेच शाखा अभियंता सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, सरपंच यांनी नळजोडणीसाठी विशेष प्रयत्न केले असून आधार कार्ड जोडून ही नळ जोडणी नोंदणी पूर्ण करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या व शाळांना पिण्याच्या पाण्यासाठी वैयक्तिक नळजोडणी देण्याबाबत शासनाचे निर्देश होते. त्याप्रमाणे सर्व ग्रामपंचायतींनी पंधराव्या वित्त आयोगातून शाळा व अंगणवाड्यांना नळजोडणी दिली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता वाघमोडे यांनी दिली आहे.

मार्च २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीमध्ये उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याचे धोरण ठरलेले असून, पहिल्या वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व गटविकास अधिकारी तसेच ग्रामीण पाणीपुरवठाचे उपअभियंता, शाखा अभियंता, ग्रामसेवक यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.