शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

कीटकजन्य आजारांचा वाढला प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:23 IST

वडवणी : शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहे. डासांची उत्पत्ती होत असून नियंत्रणासाठी नगरपंचायतकडून कुठल्याही उपाययोजना ...

वडवणी : शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहे. डासांची उत्पत्ती होत असून नियंत्रणासाठी नगरपंचायतकडून कुठल्याही उपाययोजना राबविल्या जात नाही. घाणीचे साम्राज्य पसरले याचा परिणाम होत आहे.

रस्ता खड्डेमय

वडवणी : येथील आठवडे बाजार रस्ता खड्डेमय झाला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतरावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मार्ग काढताना त्रास होतो. गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आहे.

पिकांवरील रोगांबाबत मार्गदर्शनाची मागणी

वडवणी : गेल्या हंगामात कापसावर आलेली बोंडअळी व बोगस सोयाबीन बियाणे, यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षीही अनेक शेतामधील सोयाबीन पिवळे पडले. तर कपाशीवर ही रोगाचे प्रमाण वाढले आहे. कृषी विभागाने ग्रामीण भागात जाऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

बांधकाम सुरू झाल्यास मिळेल रोजगार

वडवणी : कोरोनामुळे अनेक शासकीय बांधकामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडली आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून, मजूर वर्ग आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासकीय बांधकामे सुरू करण्याची मागणी होत आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू तरी पाठ्यपुस्तक नाही

वडवणी : दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शिक्षा अभियान योजनेतून विद्यार्थ्यांचा हातात पडणारी पाठ्यपुस्तक यावर्षी अर्धा जुलै महिना संपत आला तरी विद्यार्थ्यांना मिळाली नाही. मागीलवर्षी जून अखेर पुस्तकांचे वाटप झाले होते. परंतु, यावर्षी मात्र पुस्तके कधी मिळणार, यावर कोणीच बोलायला तयार नाही. अशातच १५ जुलैपासून वर्ग आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली होत आहे. अशा स्थितीत पुस्तक शिवाय अध्यापन कसे करावे, अशा प्रश्न शिक्षकांपुढे, तर पुस्तकांविना अध्ययन व गृहपाठ कसा करावा, अशी समस्या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

शेतमजुरीचे दर वाढले

वडवणी : तालुक्यात यंदा मृग व रोहिणी नक्षत्राचा दमदार पाऊस बरसला. त्यामुळे नदी, नाले वाहते झाले. खरीप पिकांसाठी यंदा अनुकूल हवामान व पावसाची ही साथ मिळाल्याने कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांना पोषक वातावरण मिळत आहे. मात्र मजुरीचे सातत्याने वाढच असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे तर काही ठिकाणी शेतकरी त्रस्त झाले आहेत.

पिकांना जीवदान

वडवणी : तालुक्यात सलग दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील पिकांना पोषक वातावरण मिळत असून काही ठिकाणी झालेल्या पावसाने जीवदान ही मिळत आहे .अनेक दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी होते.