शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

जांभूळ फळाला वातावरण बदलाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:23 AM

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ग्रामीण भागात आरोग्यदायी असणाऱ्या जांभूळ फळाला चांगली मागणी आहे. यंदा या फळाला वातावरण बदलाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : ग्रामीण भागात आरोग्यदायी असणाऱ्या जांभूळ फळाला चांगली मागणी आहे. यंदा या फळाला वातावरण बदलाचा फटका बसल्याने कमी बहर आला आहे. दर मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढले आहेत.

वातावरणातील बदल व अवकाळी पाऊस यामुळे कमी प्रमाणात बहर आल्याने बाजारात जांभळाची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे मागणी वाढत असल्याने दरही वाढले आहेत. शरीरातील जीवनसत्त्व वाढविण्यासाठी हे फळ प्रभावी मानले जाते. पावसाळ्यात हे फळ खाणे म्हणजे आजारपणाला दूर ठेवणे होय. सध्या अंबाजोगाई शहरातील शिवाजी चौक, मंडीबाजार, तर ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवरही जांभळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. राज्य रस्त्यावरासह परिसरातील रस्त्यावर जांभळांची छोटी, छोटी दुकाने प्रवासी वर्गाचे आकर्षण ठरत आहेत.

....

पाच किलोची टोपली ६०० रुपये

दरवर्षी जांभूळ फळ मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत येते. यंदा हवामानातील बदल व कोरोनामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद झाल्याने जांभूळ फळाची आवक अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. सध्या फळाचा दर्जा पाहून प्रतिकिलोला १०० ते १३० रुपयांपर्यंत भाव मोजावा लागत आहे.

...

आम्ही दरवर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात जांभूळ फळाचे पीक घेतो; परंतु मागील हंगामापासून वातावरणातील बदलामुळे झाडावर फळधारणा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. यंदाही कमी प्रमाणात फळ हातात पडत आहे. त्यामुळे शेतीसाठी मिळणारे भांडवलही कमी प्रमाणात मिळत आहे. यंदा फळांचा राजा आंब्यालाही चांगली मागणी राहिली. आजही आंब्याचे दर प्रतिकिलो १०० रुपयांच्या आसपास आहेत. कोरोना आणि अवकाळी पावसाचा फटका आंब्यालाही बसला. तसाच तो जांभळालाही बसला आहे. बाजारात जांभळाची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे मागणी वाढत असल्याने दरही वाढत आहेत.

-गणेश रुद्राक्ष, शेतकरी

...

शरीरातील जीवनसत्त्व वाढविण्यासाठी हे फळ प्रभावी मानले जाते, तसेच पावसाळ्यात हे फळ खाणे म्हणजे आजारपणाला दूर ठेवणे होय. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी जोपर्यंत जांभूळ उपलब्ध आहे तोपर्यंत नियमित खावे. दररोज किमान १० जांभळे खावीत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

-डॉ.अतुल शिंदे, मधुमेहतज्ज्ञ, अंबाजोगाई