गरम पाणी अंगावर पडल्याने आई भाजली तर मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:51+5:302021-07-07T04:41:51+5:30
हीच ती गरम पाण्याची टाकी. गेवराई : तालुक्यातील तळणेवाडी येथील गणेशनगर भागात पाहुण्यांच्या घरी राहत असलेल्या आई व मुलाच्या ...

गरम पाणी अंगावर पडल्याने आई भाजली तर मुलाचा मृत्यू
हीच ती गरम पाण्याची टाकी.
गेवराई : तालुक्यातील तळणेवाडी येथील गणेशनगर भागात पाहुण्यांच्या घरी राहत असलेल्या आई व मुलाच्या अंगावर २ जुलै रोजी रात्री हिटर मधील गरम पाणी अंगावर पडल्याने या झालेल्या दुर्दैवी घटनेत आई किरकोळ भाजली तर मुलगा गंभीर भाजल्याने त्याचा उपचारादरम्यान ५ जुलै रोजी रात्री मृत्यू झाला. आई उपचार करून घरी आली आहे.
गोरख ज्ञानदेव कारांडे (वय ३७ ) व सत्यभामाबाई ज्ञानदेव कारांडे (वय ७५) आई व मुलगा (दोघे राहणार कळसंबर ता. जिल्हा बीड) हे कामासाठी तळणेवाडी येथे आले असता जावई विठ्ठल लक्ष्मण शेंडगे (रा. तळणेवाडी) यांच्या घरी २ जुलै रोजी रात्री जेवण करून एका खोलीत झोपले होते. बाजूला असलेल्या फायबर कॅनमध्ये हिटर मधील गरम करुन ठेवलेले पाणी झोपेत अंगावर पडल्याने यात आई किरकोळ भाजली होती. तिच्यावर बीड येथे उपचार करून घरी आणले होते. मात्र मुलगा गंभीर भाजल्याने त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. मुलाची प्रकृती गंभीर असल्याने ५ जुलै रोजी रात्री मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गोरख कारांडे मिस्त्री काम करत होता. मागील दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे नाशिक येथे काम करत होता. मात्र सोय लागत नाही म्हणून मिस्त्री काम करण्यासाठी तळणेवाडी येथे आला होता. सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी आंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी लावलेले हिटर पाणी अधिक प्रमाणात तापल्याने फायबर ड्रम पघळून खाली कलवंडले व जवळच झोपेत असलेल्या मायलेकराच्या अंगावर उकळते पाणी पडले होते. आई किरकोळ भाजली तर मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गोरख कारांडेच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक मुलगी असा परिवार आहे.
060721\sakharam shinde_img-20210706-wa0036_14.jpg~060721\sakharam shinde_img-20210706-wa0037_14.jpg