शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

चिमणी - कावळ्याच्या झुंजीत दोन झोपड्या खाक; तीन घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 2:07 PM

हातोला येथे आज दुपारी १२ वाजता झोपडपट्टीला लागलेल्या आगीत दोन झोपड्या जाळून खाक झाल्या तर तीन घरांचे अतोनात नुकसान झाले.

अंबाजोगाई (बीड ) : तालुक्यातील हातोला येथे आज दुपारी १२ वाजता झोपडपट्टीला लागलेल्या आगीत दोन झोपड्या जाळून खाक झाल्या तर तीन घरांचे अतोनात नुकसान झाले. विजेच्या तारांवरील चिमणी-कावळ्याच्या झुंजीमुळे स्पार्किंग होऊन ठिणग्या उडाल्या यात झोपड्यांनी पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

हातोला गावाने वाॅटरकप स्पर्धेत भाग घेतलेला आहे. आज सकाळचे श्रमदान आटोपून लोक गावात आलेले होते. महिला घरांकडे गेल्या होत्या, तर पुरुष लोक गावातील मंदिरासमोर थांबले होते. त्याचवेळी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावातील काही झोपड्यांना आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. वाळलेल्या कुडांमुळे आणि कडक उन्हामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. श्रमदान करून आल्यामुळे सरपंच जयसिंग चव्हाण आणि बहुतांशी ग्रामस्थ गावातच होते, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत माती आणि पाण्याच्या साह्याने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अखेर अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत सुंदर नागोराव पंडित आणि महादेव पिराजी दासूद या दोघांच्या झोपड्या पूर्णपणे जाळून भस्मसात झाल्या होत्या. तसेच प्रभावती लिंबराज माने, विठ्ठल इराप्पा लोखंडे, छायाबाई विलास गायकवाड यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आग लागल्याचे पाहताच झोपड्या शेजारच्या घरातील ग्रामस्थांनी भीतीने गॅस सिलेंडर घराबाहेर आणून टाकले. या दुर्घटनेत सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पाच कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दोन कुटुंबे तर अक्षरशः उघड्यावर आली आहेत.

चिमणी -कावळ्याच्या झुंजीने लागली आग दरम्यान, सदरील आग चिमणी-कावळ्याच्या झुंजीमुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. झोपड्याजवळून गेलेल्या विजेच्या मुख्य तारांवर चिमणी आणि कावळ्याची झुंज सुरु होती. त्यामुळे हेलकावे खावून तारा एकमेकांना घासल्याने स्पार्किंग झाली आणि ठिणग्या उडून खाली वाळलेल्या गवतावर पडल्या. आधीच उन्हामुळे तापलेल्या गवताने ठिणग्यामुळे लागलीच पेट घेतला आणि आग पसरून झोपड्यापर्यंत पोचली. तारांच्या स्पार्किंगमुळे दुर्घटनेस कारणीभूत ठरलेला कावळा देखील यात ठार झाला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजAmbajogaiअंबाजोगाईfireआग