शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याने पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 7:37 PM

पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेली हा अपमान असहय्य झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

बीड : आपली पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेली हा अपमान असहय्य झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी घडली. शुक्रवारी जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

लक्ष्मण हरिभाऊ पुरी (४०, रा. धारवंटा, ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. लक्ष्मण व त्यांची पत्नी सुनिता हे उसतोड मजूर आहेत. १० दिवसांपूर्वीच त्यांनी दोन लाख रुपयांची उचल घेतली होती. नवरात्रोत्सवानिमित्त १५ आॅक्टोबर रोजी तलवाड्यातील देवीच्या दर्शनासाठी दोघेही गेले. गर्दीत लक्ष्मणची नजर चुकवून सुनिता ही गायब झाली. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला.

या संदर्भात तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. चौकशी केली असता गावातीलच रामचंद्र वारुळे याच्यासोबत ती पळून गेल्याचे समजले. गावात सर्वत्र चर्चा झाली. त्यामुळे लक्ष्मण यांना अपमान वाटला. हा अपमान असहय्य झाल्याने त्यांनी गुरुवारी राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. बाबू पुरी यांच्या माहितीवरुन जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडWomenमहिला