शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

पाण्याकडे दिले, आता मातीकडे लक्ष राहू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:00 IST

गाव पाणीदार , पाण्याच्या बाबतीत स्वयंभू करायचे असेलतर लोकसहभाग महत्वाचा आहे. पाण्याच्या बाबतीत गल्ली ते दिल्लीपर्यंत एकमत झाले पाहिजे. दुष्काळामुळे पाण्याचे महत्व कळले. पाण्याकडे दिले आता मातीकडे लक्ष द्यावे असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी केले.

ठळक मुद्देपोपटराव पवार यांनी दिला समृद्धीचा मंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गाव पाणीदार , पाण्याच्या बाबतीत स्वयंभू करायचे असेलतर लोकसहभाग महत्वाचा आहे. पाण्याच्या बाबतीत गल्ली ते दिल्लीपर्यंत एकमत झाले पाहिजे. दुष्काळामुळे पाण्याचे महत्व कळले. पाण्याकडे दिले आता मातीकडे लक्ष द्यावे असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी केले.

गेवराई कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त येथे आयोजित केलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनाचा मंगळवारी समारोप झाला. त्यावेळी पवार बोलत होते. व्यासपीठावर स्व. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू बी. व्यंकटेश्वरलू, शेकापचे विकास शिंदे, म. फउले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, अ‍ॅग्रो इनपुटचे राष्टÑीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, प्रगतशील शेतकरी दिलीप गोरे, आष्टीचे दत्ता काकडे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शांतीलाल पटेल, कृषी विक्रेता संघटनेचे सत्यनारायण कासट, अभिनेता डॉ. सुधीर निकम, जालन्याच्या सीता राम मोहिते, परसराम भगत, पत्रकार दिलीप खिस्ती, संयोजक गणेश बेदरे, महेश बेदरे उपस्थित होते.

मंगळवारी मृदा दिनाचा संदर्भ जोडत पोपटराव पवार यांनी मातीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, विषारी औषधे, खतांचा मारा यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. हरित क्रांतीनंतर शेतीचे उत्पादन वाढले परंतु, उत्पादकता खालावत आहे. शरीराप्रमाणे मातीचे आरोग्य जपावे. शेतांमध्ये रोटाव्हेटरने कष्ट कमी केले, पण जमीन खराब झाल्याचे ते म्हणाले. २०३० पर्यंत गावात एकही व्यसनी व मधुमेहाचा एकही व्यक्ती नसला पाहिजे असा हिवरे बाजारने संकल्प केल्याचे सांगून आनंद मिळेल तेवढाच पैशाचा हव्यास करा, पीक पद्धती, खतांचे डोस याचा अभ्यास करा असे पवार म्हणाले. या वेळी सीता राम मोहिते यांनी आदर्श मार्केटिंगची सूत्रे स्पष्ट केली.

प्रास्ताविक गणेश बेदरे यांनी केले. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांना प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर डॉ. उद्धव घोडके, डॉ. सुधीर निकम, डॉ. अशोक जाधव, ब्रम्हदेव सरडे, सचिन सारडा, विनोद नरसाळे, जुबेर पठाण यांना कृषी विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार देण्यात आले.कपाशी नोव्हेंबरपर्यंतचगुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत कुलगुरु बी.व्यंकटेश्वरलू यांनी कापूस उत्पादकांनी समजुतदारपणाने घ्यावे. नोव्हेंबरपर्यंतच कपाशीचे पीक घेतले पाहिजे.दीर्घकालीन वाण घेऊ नका, बीटीसोबत रिफ्युजी (नॉन बीटी) वापरावे, विद्यापीठाच्या शिफारशीनुसारच कृषी औषधे, खते वापरावीत असे आवाहनही कुलगुरुंनी यावेळी केले.