शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

पाण्याकडे दिले, आता मातीकडे लक्ष राहू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:00 IST

गाव पाणीदार , पाण्याच्या बाबतीत स्वयंभू करायचे असेलतर लोकसहभाग महत्वाचा आहे. पाण्याच्या बाबतीत गल्ली ते दिल्लीपर्यंत एकमत झाले पाहिजे. दुष्काळामुळे पाण्याचे महत्व कळले. पाण्याकडे दिले आता मातीकडे लक्ष द्यावे असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी केले.

ठळक मुद्देपोपटराव पवार यांनी दिला समृद्धीचा मंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गाव पाणीदार , पाण्याच्या बाबतीत स्वयंभू करायचे असेलतर लोकसहभाग महत्वाचा आहे. पाण्याच्या बाबतीत गल्ली ते दिल्लीपर्यंत एकमत झाले पाहिजे. दुष्काळामुळे पाण्याचे महत्व कळले. पाण्याकडे दिले आता मातीकडे लक्ष द्यावे असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी केले.

गेवराई कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त येथे आयोजित केलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनाचा मंगळवारी समारोप झाला. त्यावेळी पवार बोलत होते. व्यासपीठावर स्व. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू बी. व्यंकटेश्वरलू, शेकापचे विकास शिंदे, म. फउले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, अ‍ॅग्रो इनपुटचे राष्टÑीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, प्रगतशील शेतकरी दिलीप गोरे, आष्टीचे दत्ता काकडे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शांतीलाल पटेल, कृषी विक्रेता संघटनेचे सत्यनारायण कासट, अभिनेता डॉ. सुधीर निकम, जालन्याच्या सीता राम मोहिते, परसराम भगत, पत्रकार दिलीप खिस्ती, संयोजक गणेश बेदरे, महेश बेदरे उपस्थित होते.

मंगळवारी मृदा दिनाचा संदर्भ जोडत पोपटराव पवार यांनी मातीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, विषारी औषधे, खतांचा मारा यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. हरित क्रांतीनंतर शेतीचे उत्पादन वाढले परंतु, उत्पादकता खालावत आहे. शरीराप्रमाणे मातीचे आरोग्य जपावे. शेतांमध्ये रोटाव्हेटरने कष्ट कमी केले, पण जमीन खराब झाल्याचे ते म्हणाले. २०३० पर्यंत गावात एकही व्यसनी व मधुमेहाचा एकही व्यक्ती नसला पाहिजे असा हिवरे बाजारने संकल्प केल्याचे सांगून आनंद मिळेल तेवढाच पैशाचा हव्यास करा, पीक पद्धती, खतांचे डोस याचा अभ्यास करा असे पवार म्हणाले. या वेळी सीता राम मोहिते यांनी आदर्श मार्केटिंगची सूत्रे स्पष्ट केली.

प्रास्ताविक गणेश बेदरे यांनी केले. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांना प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर डॉ. उद्धव घोडके, डॉ. सुधीर निकम, डॉ. अशोक जाधव, ब्रम्हदेव सरडे, सचिन सारडा, विनोद नरसाळे, जुबेर पठाण यांना कृषी विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार देण्यात आले.कपाशी नोव्हेंबरपर्यंतचगुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत कुलगुरु बी.व्यंकटेश्वरलू यांनी कापूस उत्पादकांनी समजुतदारपणाने घ्यावे. नोव्हेंबरपर्यंतच कपाशीचे पीक घेतले पाहिजे.दीर्घकालीन वाण घेऊ नका, बीटीसोबत रिफ्युजी (नॉन बीटी) वापरावे, विद्यापीठाच्या शिफारशीनुसारच कृषी औषधे, खते वापरावीत असे आवाहनही कुलगुरुंनी यावेळी केले.