शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

पाण्याकडे दिले, आता मातीकडे लक्ष राहू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:00 IST

गाव पाणीदार , पाण्याच्या बाबतीत स्वयंभू करायचे असेलतर लोकसहभाग महत्वाचा आहे. पाण्याच्या बाबतीत गल्ली ते दिल्लीपर्यंत एकमत झाले पाहिजे. दुष्काळामुळे पाण्याचे महत्व कळले. पाण्याकडे दिले आता मातीकडे लक्ष द्यावे असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी केले.

ठळक मुद्देपोपटराव पवार यांनी दिला समृद्धीचा मंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गाव पाणीदार , पाण्याच्या बाबतीत स्वयंभू करायचे असेलतर लोकसहभाग महत्वाचा आहे. पाण्याच्या बाबतीत गल्ली ते दिल्लीपर्यंत एकमत झाले पाहिजे. दुष्काळामुळे पाण्याचे महत्व कळले. पाण्याकडे दिले आता मातीकडे लक्ष द्यावे असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी केले.

गेवराई कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त येथे आयोजित केलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनाचा मंगळवारी समारोप झाला. त्यावेळी पवार बोलत होते. व्यासपीठावर स्व. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू बी. व्यंकटेश्वरलू, शेकापचे विकास शिंदे, म. फउले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, अ‍ॅग्रो इनपुटचे राष्टÑीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, प्रगतशील शेतकरी दिलीप गोरे, आष्टीचे दत्ता काकडे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शांतीलाल पटेल, कृषी विक्रेता संघटनेचे सत्यनारायण कासट, अभिनेता डॉ. सुधीर निकम, जालन्याच्या सीता राम मोहिते, परसराम भगत, पत्रकार दिलीप खिस्ती, संयोजक गणेश बेदरे, महेश बेदरे उपस्थित होते.

मंगळवारी मृदा दिनाचा संदर्भ जोडत पोपटराव पवार यांनी मातीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, विषारी औषधे, खतांचा मारा यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. हरित क्रांतीनंतर शेतीचे उत्पादन वाढले परंतु, उत्पादकता खालावत आहे. शरीराप्रमाणे मातीचे आरोग्य जपावे. शेतांमध्ये रोटाव्हेटरने कष्ट कमी केले, पण जमीन खराब झाल्याचे ते म्हणाले. २०३० पर्यंत गावात एकही व्यसनी व मधुमेहाचा एकही व्यक्ती नसला पाहिजे असा हिवरे बाजारने संकल्प केल्याचे सांगून आनंद मिळेल तेवढाच पैशाचा हव्यास करा, पीक पद्धती, खतांचे डोस याचा अभ्यास करा असे पवार म्हणाले. या वेळी सीता राम मोहिते यांनी आदर्श मार्केटिंगची सूत्रे स्पष्ट केली.

प्रास्ताविक गणेश बेदरे यांनी केले. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांना प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर डॉ. उद्धव घोडके, डॉ. सुधीर निकम, डॉ. अशोक जाधव, ब्रम्हदेव सरडे, सचिन सारडा, विनोद नरसाळे, जुबेर पठाण यांना कृषी विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार देण्यात आले.कपाशी नोव्हेंबरपर्यंतचगुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत कुलगुरु बी.व्यंकटेश्वरलू यांनी कापूस उत्पादकांनी समजुतदारपणाने घ्यावे. नोव्हेंबरपर्यंतच कपाशीचे पीक घेतले पाहिजे.दीर्घकालीन वाण घेऊ नका, बीटीसोबत रिफ्युजी (नॉन बीटी) वापरावे, विद्यापीठाच्या शिफारशीनुसारच कृषी औषधे, खते वापरावीत असे आवाहनही कुलगुरुंनी यावेळी केले.