शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
6
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
7
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
8
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
9
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
10
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
11
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
12
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
13
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
14
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
15
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
16
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
17
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
18
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
19
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
20
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

गेवराई तालुक्यात हातपंप, विहिरी ठरताहेत कुचकामी; ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 3:16 PM

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरीची; पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहारांसह अनेक गावातील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात.

ठळक मुद्देजिल्हा व तालुका प्रशासनाकडून दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.तालुक्यातील हातपंप आणि विहिरी कुचकामी ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

गेवराई (बीड ) : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरीची; पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहारांसह अनेक गावातील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात. दरवर्षी नवीन हातपंपावर मात्र नित्यनेमाने पैसा खर्च केला जातो. या कारभारामुळे तालुक्यातील हातपंप आणि विहिरी कुचकामी ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

जिल्हा व तालुका प्रशासनाकडून दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. यात नवीन हातपंप करणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, विहिरींमध्ये बोअर करणे इ. अनेक उपायांचा समावेश असतो. मात्र, हे करीत असताना जुन्या हातपंपांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवते. परिणामी अनेक ठिकाणचे हातपंप बंद अवस्थेत दिसतात.

गेवराई तालुक्यातील गढी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, जय भवानी नगर, नवोदय विद्यालय येथील काही हातपंप गत अनेक दिवसांपासून बंद आहेत. अन्य ठिकाणचे हातपंपही अनेक दिवसांपासून बंद आहेत. भूगर्भातील पाणी पातळी खालावल्यामुळे हातपंप कुचकामी ठरू लागले आहेत. पंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे हातपंप दुरूस्त करणे गरजेचे झाले आहे. गढीतील हातपंप तक्रार करूनही नादुरूस्त अवस्थेतच आहेत. गढी तथा गेवराई तालुक्यातील अनेक गावांतील हातपंप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. परिणामी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हातपंप बंद असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या; पण संबधित यंत्रणा दुरूस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत गेवराई पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी एन.पी. राजगुरु यांना माहिती विचारण्यासाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

हातपंप बनले शोभेची वस्तूतालुक्यातील अनेक गावांत हातपंप आहेत; पण कुठे पाणी खोल गेले तर कुठे दांड्यांनी माना टाकल्या आहेत. परिणामी हे हातपंप शोभेची वस्तू ठरत असल्याचे दिसून येत आहे. उपयोगाचे नसल्याने अनेक हातपंप माती मुरूमामध्ये दबलेल्या स्थितीत आढळून येतात. त्या हातपंपाची दुरूस्ती करून ते उपयोगात आणण्याचे प्रयत्न कुठेही होताना दिसत नाही. दरवर्षी नवीन हातपंपांची मागणी वाढताना दिसून येत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. तालुक्यातील हातपंपाची दुरूस्ती करण्याबाबत प्रशासन कायम उदासीन भूमिका घेत आहे. काही हातपंपांची चेन तुटली, तर कुठे पाणी खोल गेल्याने हातपंप बंद आहे.यामुळे महिलांना शेतशिवारातून पाणी आणावे लागते. ग्रामसेवकांनी तक्रार करुनही दुरूस्तीचे वाहन आले नाही.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईBeedबीडFarmerशेतकरी