शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

हायवेवर मद्यविक्रीचा मार्ग मोकळा; बीड जिल्ह्यात निम्मे परवाने ठरणार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 11:42 PM

किमान ५ हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रातून जाणाºया राज्य व राष्टÑीय महामार्गावरील मद्य विक्रीच्या परवान्यांचे नुतनीकरण होणार असल्याने वर्षभर बंद असलेले राज्य व राष्टÑीय महामार्गावरील ग्रामपंचायत हद्दीतील बिअरबार, हॉटेल गजबजणार आहेत. मात्र शासन निर्णयानुसार निकष पूर्ण केल्यानंतरच या परवान्यांचे नुतनीकरण होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : किमान ५ हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रातून जाणाºया राज्य व राष्टÑीय महामार्गावरील मद्य विक्रीच्या परवान्यांचे नुतनीकरण होणार असल्याने वर्षभर बंद असलेले राज्य व राष्टÑीय महामार्गावरील ग्रामपंचायत हद्दीतील बिअरबार, हॉटेल गजबजणार आहेत. मात्र शासन निर्णयानुसार निकष पूर्ण केल्यानंतरच या परवान्यांचे नुतनीकरण होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्य विरुद्ध के. बालू व इतर सिव्हील अपील प्रकरणात १५ डिसेंबर २०१६ रोजी दिलेल्या आदेशामुळे राज्य व राष्टÑीय महामार्गावरील ग्रामपंचायत हद्दीमधून गेलेल्या मद्यविक्री दुकानांचे परवाने १ एप्रिल २०१७ नंतर नुतनीकरण करण्यास प्रतिबंध घालण्यात आले होते.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १३ डिसेंबर २०१७ व २३ फेब्रुवारी २०१८ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने याचिकाकर्त्यांनी तसेच अन्य परवानाधारकांनी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत शासनाने चारपैकी एक निकष पूर्ण करणा-या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

निकषपात्र परवान्यांचे नूतनीकरणग्रामपंचायतींच्या मंजूर विकास आराखड्याची जिल्हा परिषदेकडून तसेच पर्यटन स्थळाबाबत वन आणि पर्यटन विभागाकडून माहिती घेत आहोत. शासनाच्या निर्णयानुसार ज्या ग्रामपंचायतींचा विकास आराखडा मंजूर आहे किंवा चारपैकी एका निकषात पात्र परवान्यांचे नूतनीकरण होऊ शकेल.- एन. के. धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड.

चार निकष : विकास आराखडा महत्त्वाचाकिमान ५ हजार लोकसंख्या असणारे ग्रामपंचायत क्षेत्र (२०११ च्या जनगणनेनुसार),ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ विकसित केलेले औद्योगिक क्षेत्र असल्यासजागतिक वारसा पर्यटन स्थळ व केंद्र शासन किंवा राज्य शासनाने घोषित केलेले पर्यटन स्थळज्या ग्रामपंचायतीचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला असेल असे क्षेत्र निकषपात्र ठरणार आहेत.

२०० पैकी किती पात्र ठरणार१ एप्रिल २०१७ पासून मद्यविक्री परवान्यांच्या नुतनीकरणास प्रतिबंध होता. देशी विदेशी दारु, बारचे २०० परवाने नुतनीकरण झाले नव्हते. आता शासनाच्या ३१ मार्चच्या निर्णयानुसार या दुकानांची निकषपात्र माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. नुतनीकरणाच्या प्रतीक्षेतील परवाने असलेल्या ३६ गावांची लोकसंख्या ५ हजार इतकी असल्याचे सांगण्यात येते. आता किती परवाने पात्र ठरणार याकडे लक्ष लागले आहे.

शासनाचा महसूल वाढणार३१ मार्चपर्यंत मद्यविक्रीचे ३५० परवाने नुतनीकरण जिल्ह्यात झाले असून, शासनाला३ कोटी रुपये महसूल मिळाला. या शासन निर्णयामुळे निकषपात्र परवाना नुतनीकरणानंतर ५० ते ६० लाख रुपयांचा महसूल वाढू शकतो.

टॅग्स :Beedबीडliquor banदारूबंदीMarathwadaमराठवाडाhighwayमहामार्ग