शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

पाच गावांमध्ये १५८४ व्यक्तींनी भरला अधिकच्या क्षेत्रावर विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 6:51 PM

पीकविमा भरताना बोगसगिरी उघड

ठळक मुद्देसर्वेक्षणात समोर आला प्रकार  बोगसगिरी केल्यामुळे इतर शेतकऱ्यांना बसतो फटका  

बीड : पीक विमा योजनेत विमा कंपनीकडून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत तसेच शेतकऱ्यांची फरपट केली जात आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील ५ गावांमध्ये केलेल्या सॅम्पल सर्वेक्षणात काही लोकांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत बोगसगिरी केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील  पाच गावांत आठ अ प्रमाणे कमी क्षेत्रफळ असताना देखील जास्तीच्या क्षेत्रफळावर पिकविमा भरला आहे तर ज्यांना शेतीच नाही अशा १६८६ पीक विमा भरल्याचे समोर आले आहे. अशा लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

बीड जिल्ह्यातील काही भागात पीक विमा योजनेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच गावात सॅम्पल सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार घाटनांदूर , अंबाजोगाई (ग्रामीण ), बदार्पूर , पूस आणि पट्टीवडगाव ही मोठ्याप्रमाणात विमा भरलेलेली गावे निवडण्यात आली होती. या गावातील विमा भरलेल्या प्रत्येक खातेदाराचे क्षेत्रनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. यात काही ठिकाणी सुरु असलेली बोगसगिरी समोर आली आहे. अंबाजोगाईचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. 

घटनांदूर २४३, अंबाजोगाई ग्रामीण ९५६, बर्दापूर २३०, पट्टीवडगाव २१७ , पूस ३६ इतक्या व्यक्तींनी विमा भरला. मात्र त्यांच्या नावे शेत जमीन असल्याचे सर्वेमध्ये उघड झाले आहे. त्याच प्रमाणे याच ५ गावांमध्ये १५८४ शेतकऱ्यांनी क्षेत्रापेक्षा जास्त विमा भरल्याचे समोर आले आहे. घटनांदूर, पट्टीवडगाव आणि पूस या गावांमध्ये लागवडीयोग्य क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रात विमा भरण्यात आला असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बोगसगिरी केल्यामुळे इतर शेतकऱ्यांना बसतो फटका  पीकविमा योजनेतून गैरप्रकार करून लाभ घेतल्याचे समोर आल्यामुळे, जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांचा पीक विमा जाहीर झाला, मात्र परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात कंपनीने अद्याप विमा जाहीर केलेला नाही.विमा संरक्षित क्षेत्र वाढते. हे लागवडीयोग्य किंवा पेरणी झालेल्या क्षेत्रापेक्षा जास्त दिसून आले की नुकसानभरपाईची जबाबदारी टाळण्यासाठी विमा कंपनी सर्रास सर्वांनाच ह्यओव्हर इन्शुअरन्सह्ण च्या नावाखाली विमा नाकारते. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांना मात्र फटका बसतो.

कंपनीनेने केलेला सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हा प्रशासनस प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, मात्र, जास्तीचे क्षेत्र दाखवून किंवा शेती नसताना पीकविमा भरु नये असे प्रकार पुढे आले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते    - रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी बीड  

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडCrop Insuranceपीक विमा