शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

डाकेपिंप्रीत तारांच्या घर्षणाने आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:15 AM

तालुक्यातील डाके पिंपरी येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे गोदाकाठी मोठी आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने वणव्यासारखी आग पसरत गेली.

ठळक मुद्दे५० ते ६० लाखांचे नुकसान : शेतकऱ्यांचे पशुधन वाचले; चारा जळून झाला खाक

माजलगाव/ गंगामसला : तालुक्यातील डाके पिंपरी येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे गोदाकाठी मोठी आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने वणव्यासारखी आग पसरत गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे पशुधन वाचले, मात्र चारा जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.डाके पिंपरी हे तालुक्यातील सधन गाव असून, गावाला गोदाकाठ लाभल्यामुळे शेतकरी देखील प्रगत आहेत. परंतु गावाला दृष्ट लागावी अशी घटना गुरुवारी दुपारी घडली. नदीच्या कडेला असलेल्या विद्युत तारांच्या घर्षणातून आगीच्या ठिणग्या पडल्यामुळे अचानक आग लागली. ही बाब गावकºयांच्या लक्षात येईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले आणि गावकºयांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. गावकºयांनी कोठ्यांना आगी लागत असल्याने पशुधन सुरक्षित करुन घेतले. मात्र, गोठ्यालगत असलेल्या कडब्याच्या गंजीला आगी लागत गेल्यामुळे मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या आगीत गोठ्यावरील शेती उपयोगी साहित्य ठिबक संच, ट्रॅक्टरचे साहित्य , पेरणी यंत्र, काढून ठेवलेल्या पाईपलाईन, मोटार आदीसह मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. तसेच गावासाठी असलेली पाण्याची टाकी व अडीच हजार कडबा असणाºया ९ ते १० गंजी जळून खाक झाल्या. यात शेतकºयांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत सुशील एकनाथ डाके, गोपाळ गंगाधर डाके , पांडुरंग मनोहर डाके, आसाराम तुकाराम डाके, प्रल्हाद शेषेराव डाके, भरत सूर्यकांत डाके, बळीराम भीमराव डाके, आश्रूबा भाऊराव डाके, सतीश दत्तात्रय डाके, गजेंद्र अच्युत डाके आदींसह अनेक शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले.आग विझविण्यासाठी गावकºयांनी शर्थीचे प्रयत्न केले. कोणी छोट्या विद्युत मोटारी चालू करून तर कोणी हाताने पाणी मारुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच माजलगाव नगर परिषदेचा अग्निशमन बंब देखील वेळेवर पोहोचला. परंतु आग नियंत्रणात येत नव्हती. वृत्त लिहिपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. तर ती अजूनही फैलतच असल्याने परिस्थिती गंभीर होताना दिसत होती.गावात वीजपुरवठा खंडित झाला असल्याने सद्य परिस्थितीला पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही. महावितरणच्या संबंधित अधिकाºयांना फोन केला असता फोन घेण्याचीही तसदी अधिकारी घेत नाहीत. गावाची परिस्थिती भयावह झाली आहे. आम्हाला कोणी वाली आहे का नाही, असे सरपंच गणेश डाके म्हणाले.

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरणfireआग