शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

'अखेर सांडवा फोडलाच'; ग्रामस्थांचा विरोध डावलून प्रशासनाने २० टक्के पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:33 PM

धारूर तालूक्यात आरणवाडी साठवण तलावाचे काम गेल्या सतरा वर्षापासून संथ गतीनै सुरू होते. यावर्षी हे काम कसे तरी पूर्ण झाले. त्यानंतर पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठा मुबलक प्रमाणात जमा झाला.

ठळक मुद्दे या तलावाच्या बाजूने गेलेल्या पर्यायी राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना रस्त्याची उंची वाढवली नाही. एमएसआरडी ने २० जुलैला पञ देऊन पाणी साठा कमी ठेवावा, रस्त्यास धोका होऊ शकतो, असे कळवले.

धारूर ( बीड )  : पाच गावच्या ग्रामस्थांचा विरोध असताना रविवारी पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सुरक्षितेचे कारण पुढे करत आरणवाडी येथील तलावाचा सांडवा फोडला. आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल १७ वर्षानंतर पूर्ण झाले आहे. पहिल्याच वर्षी अधिकाऱ्यांनी सांडवा फोडून २० टक्के साठा कमी केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. 

धारूर तालूक्यात आरणवाडी साठवण तलावाचे काम गेल्या सतरा वर्षापासून संथ गतीनै सुरू होते. यावर्षी हे काम कसे तरी पूर्ण झाले. त्यानंतर पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठा मुबलक प्रमाणात जमा झाला.  दरम्यान, या तलावाच्या बाजूने गेलेल्या पर्यायी राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना रस्त्याची उंची वाढवली नाही. एमएसआरडी ने २० जुलैला पञ देऊन पाणी साठा कमी ठेवावा, रस्त्यास धोका होऊ शकतो, असे कळवले. त्यानंतार पाटबंधारे विभागाचे अधिकारी जागे झाले. तलावाचे सुरक्षितेचे कारण पुढे करत ८० ते ८५ % पाणी ठेवता येईल, असे निरीक्षण नोंदवून सुरक्षितेसाठी सांडवा फोडावाच लागेल अशी भुमिका घेतली. माञ, पाच गावच्या ग्रामस्थांनी यांला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली. मात्र, शनिवारी रात्री  पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता,  कार्यकारी अभियंत्यांनी अचानक पञ देऊन रविवारी सकाळी हा सांडवा फोडण्यास सुरूवात केली. 

अधिकार शाहीपुढे ग्रामस्थांची नरमाई हा सांडवा उभा दोन मिटर तर आडवा दहा फुट फोडण्यात येत असून अधिकारशाही पुढे ग्रामस्थाना हात टेकावे लागले. अधिकाऱ्यांचनी भीतीने कुठलेहि शासन पञक व नियम, निर्णय नसताना सांडवा फोडला असेल तर वरीष्ठ पातळीवरून यांची चौकशी होणे आवश्यक आहे.

गाव आणि तलावाच्या सुरक्षेसाठी सांडवा फोडला आरांवादी साठवण तलावाचे काम यावर्षी पूर्ण झाले. या तलावात ९० टक्के पाणीसाठा झाला. पहिले वर्ष असल्याने पाणीसाठा कमी असणे तलावाच्या सुरक्षितेसाठी आवश्यक होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणीनंतर तलावाखालील गावाची सुरक्षा लक्षात घेता हा सांडवा फोडणे आवश्यक होते. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा सांडव्याचे काम पूर्ववत करण्यात येईल, असे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यू.व्ही. वानखेडे यांनी सांगितले. 

सांडवा फोडणे दुर्दैवी तलावाचे काम याच वर्षी झालेले असून पाणीसाठा झालेला असताना सांडवा फोडावा लागणे, हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना तो फोडल्यामुळे चौकशाची मागणी शेकापचे भाई मोहन गुंड यांनी केली आहे.  

टॅग्स :BeedबीडWaterपाणीFarmerशेतकरी