शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

घाटनांदूरमध्ये दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST

लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीसुध्दा घाटनांदूर येथील संपूर्ण बाजारपेठ, किरणा, कापड दुकाने, हॉटेल खाणावळ, पानटपऱ्या ,बार, इतर व्यापारी आस्थापने अगदी कडेकोट ...

लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीसुध्दा घाटनांदूर येथील संपूर्ण बाजारपेठ, किरणा, कापड दुकाने, हॉटेल खाणावळ, पानटपऱ्या ,बार, इतर व्यापारी आस्थापने अगदी कडेकोट बंद होती. घाटनांदूरच्या सभोवताली पस्तीस ते चाळीस वाडी, खेडे आहेत. त्यांचा दैनंदिन व्यवहार घाटनांदूरच्या व्यापारी बाजारपेठेवर अवलंबून आहे. मात्र कारण लॉकडाऊन लागले की सर्वच अत्यावश्यक असलेल्या किराणामालाचे भाव वाढले आहेत. मनमानी भावाचा कळस झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल त्या भावाने किराणा घेण्याशिवाय पर्याय त्यांच्यासमोर राहिलेला नाही.

हॉटेल बंद असल्याने दुग्ध उत्पादन करणारे पशुपालक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊननमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असून, पर्याय नसल्याने सर्व काही निमूटपणे सहन करावे लागत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन योग्य असले तरीही प्रशासनाचा काडीचाही अंकुश नसल्याने दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या किमती भरमसाठ वाढल्याने गोरगरीब मात्र अडचणीत सापडले आहेत. संपूर्ण बाजारपेठ ओस पडली असून, सोबतच उन्हाचा पारा वाढल्याने रस्ते सुनसान झाले आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वच आपापल्या घरात राहण्यास प्राधान्य देत आहेत. लॉकडाऊन शेतकरी,शेतमजूर,कामगार यांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे.

शेतकरी, मजुरांची हेळसांड

लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प झाले असून, भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दररोज लागणारा भाजीपाला उत्पादित करून तो विकून प्रपंच चालविणारे शेतकरी देशोधडीला लागत आहेत. उत्पादित भाजीपाला विकायचा कुठे, हा प्रश्न असून तो गुरांना खायला घालण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हातावर पोट असणाऱ्या मजूरवर्गाची सर्वात जास्त हेळसांड होत आहे.

===Photopath===

270321\20210327_100207_14.jpg