शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

जाफराबादेत निसर्गाच्या कोपानंतर बळीराजाला वीजकंपनीचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:20 PM

वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने यावर्षी जाफराबाद तालुक्यात १८ हजार ७०० हेक्टरवर रबी हंगामाची पेरणी झाली. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी मिळत नाही. निसर्गाच्या कोपानंतर शेतकऱ्यांना महावितरण एक प्रकारचा ‘शॉक’ देत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे१८ हजार हेक्टरवर लागवड : वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रबीची पिके धोक्यात

जाफराबाद : वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने यावर्षी जाफराबाद तालुक्यात १८ हजार ७०० हेक्टरवर रबी हंगामाची पेरणी झाली. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी मिळत नाही. निसर्गाच्या कोपानंतर शेतकऱ्यांना महावितरण एक प्रकारचा ‘शॉक’ देत असल्याचे दिसत आहे.पूर्णा, धामना, केळणा नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये यावर्षी सर्वाधिक रबीची पेरणी झाली. चांगला पाऊस झाल्याने यावर्षी पिके चांगली आली. सध्या रबी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पिकांना वाढीसाठी पाण्याची गरज आहे. परंतु, महिन्याभरापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. १० मिनिंटाला लाईट जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहे.महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे पाणी असतानाही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील रबी हंगाम धोक्यात आला असून, शेतकरी चिंतेत सापडले आहे. निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी हैराण झाल्याने शेतक-यांना महावितरण ‘शॉक’ देत आहे.कृषी पंपांना शासनाने भारनियमन ठरवून दिले आहे. अधिका-यांनी शासनाच्या भारनियमां व्यतिरिक्त अधिकचे भारनियमन सुरू केले आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी नियोजन न करता आपल्या सोयीनुसार काम करीत असल्याचा आरोप शेतक-यांकडून होत आहे. याबाबत अभियंता डब्ल्यू. आर. गांधीले यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.लागवड : उसाच्या क्षेत्रात वाढयावर्षी कृषी विभागाच्या अहवालानुसार १८ हजार ७०० हेक्टरवर पेरण्या झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात रबीच्या पिकाची लागवड जवळपास २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे.पाऊस चांगला असल्याने यावर्षी शाळू ज्वारीची पेरणी ५ हजार ६२४, मका २ हजार ४०२, गहू ३ हजार ४३६, हरबरा ७ हजार २३६, करडई १० एकरवर पेरणी करण्यात आली आहे. या शिवाय तालुक्यात उसाच्या क्षेत्रात देखील वाढ होणार असून, सीडस् कांद्याची सुध्दा शेतक-यांनी लागवड केली आहे. परंतु, सध्या पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके हातातून जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :JalanaजालनाmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी