शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

Drought In Marathwada : सोयाबीन गेले, रबीही नाही ! जगायचे आणि जगवायचे कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 12:29 IST

दुष्काळवाडा : अंबाजोगाईपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या पूस या गावात ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट दिली असता गंभीर दुष्काळाची चाहुल जाणवली.

- अविनाश मुडेगांवकर पूस, ता. अंबाजोगाई, जि. बीड.

विहिरींनी तळ गाठला. सोयाबीन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. रबीचा पेरा होणार नाही. स्वत: जगायचे कसे आणि गुरांना जगवायचे कसे, ही चिंता बळीराजाला सतावत आहे. अंबाजोगाईपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या पूस या गावात ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट दिली असता गंभीर दुष्काळाची चाहुल जाणवली.  

गावातील लोकांचा उपजिविका शेतीवर आहे. पावसाच्या भरवशावरच इथली शेती अवलंबून आहे. गावचा तलाव भरला तरच विहिरीला व इंधन विहिरीला पाणी मिळते. अन्यथा पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर येते. ४ हजार ५०० लोकसंख्येच्या पूस गावाचे भौगोलिक क्षेत्र २४५० हेक्टर असून खरिपाचा पेरा २४१० हेक्टरवर करण्यात आला. सर्वात जास्त सोयाबीनचा पेरा १९१० हेक्टरमध्ये झाला. पावसाने हुलकावणी दिल्याने सोयाबीन हातचे गेले. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. 

खरिपाच्या पेऱ्यानंतर दोन पावसांमुळे सोयाबीन तग धरत असतानाच तब्बल दोन महिने पावसाने हुलकावणी दिल्याने पीक पूर्णत: उद्धवस्त झाले. गावात सप्टेंबर अखेरपासूनच पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जलस्त्रोत  निकामी होत चालल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. अशा भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांनी करायचे काय?  उत्पन्नच नाही तर मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न करायचे कसे? हे या शेतकऱ्यांचे प्रश्न. दुष्काळाचे सावट घोंघावत असताना सरकारी आणेवारी मात्र ५६ पैशांवर जाऊन पोहचली. ही अनोखी जादू शासनाने कशी केली, असे विचारत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. 

- ८२, २३० : हेक्टर  अंबाजोगाई तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र - ७६७६५ : हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र- ७५५१९ : हेक्टरवर यंदा प्रत्यक्ष पेरणी

- तालुक्यात झालेला पाऊस (मि.मी.मध्ये)२०१४ - ७७९ २०१५ - ६३०२०१६ - ९९० २०१७ - ९०२२०१८ - ६७९ 

उत्पन्नात घट होणार अंबाजोगाई तालुक्यात पिकांच्या उत्पन्नात यंदा ४० टक्के  घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी रबी हंगाम होतो की नाही, अशी स्थिती  आहे. याबाबतचा सर्व अहवाल प्रशासनाकडे पाठविला आहे. - गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी. 

बळीराजा काय म्हणतो? 

- दुष्काळी  स्थितीमुळे  जनावरांचा प्रश्न बिकट बनला आहे. शेतातील ऊस साखर कारखान्याला घालण्यापेक्षा तो जनावरांसाठी ठेवावा लागणार आहे. रबीअभावी खाण्यासाठी लागणारे धान्यही उपलब्ध होणार नाही. ना पैसा अडका, ना खायला धान्य अशी अवस्था झाली आहे. - पप्पू आदनाक 

- शासनाने शेतावर जाऊन पीकपरिस्थिती व दुष्काळी स्थिती पाहून खरी पैसेवारी जाहीर करावी. - वैजनाथ देशमुख 

- यावर्षी खरीप हंगामात सोयाबीनचा एका पिशवीमागे एक ते दोन क्विंटलचा उतारा आला.  कुटुंब कसे चालवायचे? जनावरांचा सांभाळ कसा करायचा ?  पाणी व चारा कोठून उपलब्ध करायचे ? जनावरे विकायची म्हटले तर बाजारातही भाव नाही.  - तात्याराव हाके  

- माझ्याकडे बारा एकर शेती आहे. विहिरीवर दोन विद्युतपंप चालतात. एक इंधन विहिर आहे. पण  विजेअभावी व  सततच्या बिघाडामुळे पाणी देता येत नाही.  आता यावर्षी पाऊस नाही. म्हणून शेती पिकत नाही. - धोंडिराम शेप- खरिपाचा हंगाम वाया गेला, रबीची चिंता आहे. निसर्गाने खेळ मांडल्याने पिकतही नाही व विकतही नाही. खायचं काय ? जनावरं कशी सांभाळायची? - उत्तमराव बावणे 

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीWaterपाणी