शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

Drought In Marathwada : खरिपात होरपळलो, रबीचे कसे होईल? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 18:32 IST

दुष्काळ शिरूर तालुक्याच्या पाचवीलाच पुजला असून, हातात कोयता हे समीकरण टिकून आहे. यावर्षी सरासरीच्या निम्मादेखील पाऊस न झाल्याने तालुका होरपळून निघाला आहे.

- विजयकुमार गाडेकर, झापेवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड दुष्काळ शिरूर तालुक्याच्या पाचवीलाच पुजला असून, हातात कोयता हे समीकरण टिकून आहे. यावर्षी सरासरीच्या निम्मादेखील पाऊस न झाल्याने तालुका होरपळून निघाला आहे. खरिपाचा हंगाम खर्च करून हात मोकळे करून गेला. जलाशये कोरडे असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ३८ % पाऊस शिरूर तालुक्यात झाला आहे. तालुक्यात महसुली गावांची संख्या ७४ असून, तीनही मंडळांत स्थिती सारखीच आहे. शासनाने संपूर्ण शिरूर तालुक्याची खरीप हंगामातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केली आहे. आता चारा, पाण्याच्या प्रश्नामुळे पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न आहे. त्रासून सोडणारी ही विदारकता ‘लोकमत’ प्रतिनिधीने झापेवाडी परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली असता निदर्शनास आली.  

शिरूरच्या पूर्वेला तीन कि.मी. अंतरावर असलेल्या या गावातील जमीन मध्यम व हलक्या स्वरूपाची; परंतु कष्टाच्या बळावर शेतात राबणारे हे गाव. जवळपास निम्मे लोक ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. यावर्षी तर पाऊसच नसल्याने पिकांची वाताहात झाली. ऊसतोडीला न जाणारेदेखील यंदा जाण्याच्या तयारीत आहेत. उचल नसली तरी चालेल; पण आम्हाला येऊ द्या, असा आग्रह धरत असल्याचे ऊसतोड मुकादम सीताराम पवार यांनी सांगितले. 

येथील शेतकरी पांढऱ्या सोन्याला भाळला. मात्र, लाल्या आणि बोंडअळीने कापसाची नव्हे शेतकऱ्यांची चांगलीच जिरवली. तूर, मूग घुगऱ्या खाण्याइतपतही झाला नाही. उडीद ,भुईमूग, तीळ, सोयाबीन, कारळाची पिके केव्हाच हातातून निसटली. खरीप हंगाम आला तसा गेला. जाताना मात्र खर्ची घेऊन गेला. आता रबीचे काय? हा प्रश्न भेडसावत आहे. महिनाभरा इतकाच वाळलेला चारा आहे. त्यामुळे चाऱ्यासाठी ऊस वापरण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. शिरूर तालुक्यात २०१४ मध्ये ३६३ मि.मी., २०१५ मध्ये २७३, २०१६ मध्ये ६३३, २०१७ मध्ये ५९१, २०१८ मध्ये ४ आॅक्टोबरपर्यंत २२८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शिरूर तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ५९९.४ मि.मी. इतकी आहे. यंदा केवळ २२९ मि.मी. पाऊस झाला आहे. 

बळीराजा काय म्हणतो?

मला अवघी दीड एकर जमीन आहे. त्यात घेतलेले पीक शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे कसे होणार हाच विचार भंडावून सोडत आहे. -विठ्ठल विश्वनात राऊत

माझ्याकडे चार एकर शेती आहे. चार मोठी जनावरे, पाच शेळ्या असा प्रपंच. आता मात्र हे सर्व बिºहाड ऊसतोडीसाठी गेल्याशिवाय भागणार नाही. -अभिमान एकनाथ मोरे

मी अशी वेळ कधी पाहिली नव्हती. दुष्काळ पाहिले; परंतु पाण्याचे दुर्भिक्ष अनुभवले नव्हते.-आश्रुबा रावजी राऊत 

आमचे अकरा माणसांचे कुटुंब. पंधरा-सोळा एकर जमिनीत जवळपास सव्वालाख रुपये खर्च केले; परंतु यावर्षी आमच्यावर ऊसतोडीला जाण्याची वेळ आली आहे. -संगीता कृष्णाथ गंडाळ 

यावर्षी दुहेरी फटका बसल्याने हवालदिल झालो आहोत. आता सरकारनेच दिलासा द्यावा.-बापूराव मोरे

रबी हंगाम पावसावरचपाऊस कमी झाल्याने खरीप हंगामात स्थिती बिकट झाली आहे.  रबी हंगाम पावसावरच अवलंबून आहे. फळबागेबाबत शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामानआधारित फळपीक विमा काढून आपली बाग विमा संरक्षित करावी. -भीमराव बांगर, तालुका कृषी अधिकारी, शिरूर कासार

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी