शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
2
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
3
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
4
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
5
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
6
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
7
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
8
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
9
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
10
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
11
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
12
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
13
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
14
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
15
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
16
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
17
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
18
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
19
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
20
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : खरिपात होरपळलो, रबीचे कसे होईल? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 18:32 IST

दुष्काळ शिरूर तालुक्याच्या पाचवीलाच पुजला असून, हातात कोयता हे समीकरण टिकून आहे. यावर्षी सरासरीच्या निम्मादेखील पाऊस न झाल्याने तालुका होरपळून निघाला आहे.

- विजयकुमार गाडेकर, झापेवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड दुष्काळ शिरूर तालुक्याच्या पाचवीलाच पुजला असून, हातात कोयता हे समीकरण टिकून आहे. यावर्षी सरासरीच्या निम्मादेखील पाऊस न झाल्याने तालुका होरपळून निघाला आहे. खरिपाचा हंगाम खर्च करून हात मोकळे करून गेला. जलाशये कोरडे असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ३८ % पाऊस शिरूर तालुक्यात झाला आहे. तालुक्यात महसुली गावांची संख्या ७४ असून, तीनही मंडळांत स्थिती सारखीच आहे. शासनाने संपूर्ण शिरूर तालुक्याची खरीप हंगामातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केली आहे. आता चारा, पाण्याच्या प्रश्नामुळे पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न आहे. त्रासून सोडणारी ही विदारकता ‘लोकमत’ प्रतिनिधीने झापेवाडी परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली असता निदर्शनास आली.  

शिरूरच्या पूर्वेला तीन कि.मी. अंतरावर असलेल्या या गावातील जमीन मध्यम व हलक्या स्वरूपाची; परंतु कष्टाच्या बळावर शेतात राबणारे हे गाव. जवळपास निम्मे लोक ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. यावर्षी तर पाऊसच नसल्याने पिकांची वाताहात झाली. ऊसतोडीला न जाणारेदेखील यंदा जाण्याच्या तयारीत आहेत. उचल नसली तरी चालेल; पण आम्हाला येऊ द्या, असा आग्रह धरत असल्याचे ऊसतोड मुकादम सीताराम पवार यांनी सांगितले. 

येथील शेतकरी पांढऱ्या सोन्याला भाळला. मात्र, लाल्या आणि बोंडअळीने कापसाची नव्हे शेतकऱ्यांची चांगलीच जिरवली. तूर, मूग घुगऱ्या खाण्याइतपतही झाला नाही. उडीद ,भुईमूग, तीळ, सोयाबीन, कारळाची पिके केव्हाच हातातून निसटली. खरीप हंगाम आला तसा गेला. जाताना मात्र खर्ची घेऊन गेला. आता रबीचे काय? हा प्रश्न भेडसावत आहे. महिनाभरा इतकाच वाळलेला चारा आहे. त्यामुळे चाऱ्यासाठी ऊस वापरण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. शिरूर तालुक्यात २०१४ मध्ये ३६३ मि.मी., २०१५ मध्ये २७३, २०१६ मध्ये ६३३, २०१७ मध्ये ५९१, २०१८ मध्ये ४ आॅक्टोबरपर्यंत २२८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शिरूर तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ५९९.४ मि.मी. इतकी आहे. यंदा केवळ २२९ मि.मी. पाऊस झाला आहे. 

बळीराजा काय म्हणतो?

मला अवघी दीड एकर जमीन आहे. त्यात घेतलेले पीक शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे कसे होणार हाच विचार भंडावून सोडत आहे. -विठ्ठल विश्वनात राऊत

माझ्याकडे चार एकर शेती आहे. चार मोठी जनावरे, पाच शेळ्या असा प्रपंच. आता मात्र हे सर्व बिºहाड ऊसतोडीसाठी गेल्याशिवाय भागणार नाही. -अभिमान एकनाथ मोरे

मी अशी वेळ कधी पाहिली नव्हती. दुष्काळ पाहिले; परंतु पाण्याचे दुर्भिक्ष अनुभवले नव्हते.-आश्रुबा रावजी राऊत 

आमचे अकरा माणसांचे कुटुंब. पंधरा-सोळा एकर जमिनीत जवळपास सव्वालाख रुपये खर्च केले; परंतु यावर्षी आमच्यावर ऊसतोडीला जाण्याची वेळ आली आहे. -संगीता कृष्णाथ गंडाळ 

यावर्षी दुहेरी फटका बसल्याने हवालदिल झालो आहोत. आता सरकारनेच दिलासा द्यावा.-बापूराव मोरे

रबी हंगाम पावसावरचपाऊस कमी झाल्याने खरीप हंगामात स्थिती बिकट झाली आहे.  रबी हंगाम पावसावरच अवलंबून आहे. फळबागेबाबत शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामानआधारित फळपीक विमा काढून आपली बाग विमा संरक्षित करावी. -भीमराव बांगर, तालुका कृषी अधिकारी, शिरूर कासार

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी