शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

Drought In Marathwada : खरिपात होरपळलो, रबीचे कसे होईल? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 18:32 IST

दुष्काळ शिरूर तालुक्याच्या पाचवीलाच पुजला असून, हातात कोयता हे समीकरण टिकून आहे. यावर्षी सरासरीच्या निम्मादेखील पाऊस न झाल्याने तालुका होरपळून निघाला आहे.

- विजयकुमार गाडेकर, झापेवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड दुष्काळ शिरूर तालुक्याच्या पाचवीलाच पुजला असून, हातात कोयता हे समीकरण टिकून आहे. यावर्षी सरासरीच्या निम्मादेखील पाऊस न झाल्याने तालुका होरपळून निघाला आहे. खरिपाचा हंगाम खर्च करून हात मोकळे करून गेला. जलाशये कोरडे असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ३८ % पाऊस शिरूर तालुक्यात झाला आहे. तालुक्यात महसुली गावांची संख्या ७४ असून, तीनही मंडळांत स्थिती सारखीच आहे. शासनाने संपूर्ण शिरूर तालुक्याची खरीप हंगामातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केली आहे. आता चारा, पाण्याच्या प्रश्नामुळे पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न आहे. त्रासून सोडणारी ही विदारकता ‘लोकमत’ प्रतिनिधीने झापेवाडी परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली असता निदर्शनास आली.  

शिरूरच्या पूर्वेला तीन कि.मी. अंतरावर असलेल्या या गावातील जमीन मध्यम व हलक्या स्वरूपाची; परंतु कष्टाच्या बळावर शेतात राबणारे हे गाव. जवळपास निम्मे लोक ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. यावर्षी तर पाऊसच नसल्याने पिकांची वाताहात झाली. ऊसतोडीला न जाणारेदेखील यंदा जाण्याच्या तयारीत आहेत. उचल नसली तरी चालेल; पण आम्हाला येऊ द्या, असा आग्रह धरत असल्याचे ऊसतोड मुकादम सीताराम पवार यांनी सांगितले. 

येथील शेतकरी पांढऱ्या सोन्याला भाळला. मात्र, लाल्या आणि बोंडअळीने कापसाची नव्हे शेतकऱ्यांची चांगलीच जिरवली. तूर, मूग घुगऱ्या खाण्याइतपतही झाला नाही. उडीद ,भुईमूग, तीळ, सोयाबीन, कारळाची पिके केव्हाच हातातून निसटली. खरीप हंगाम आला तसा गेला. जाताना मात्र खर्ची घेऊन गेला. आता रबीचे काय? हा प्रश्न भेडसावत आहे. महिनाभरा इतकाच वाळलेला चारा आहे. त्यामुळे चाऱ्यासाठी ऊस वापरण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. शिरूर तालुक्यात २०१४ मध्ये ३६३ मि.मी., २०१५ मध्ये २७३, २०१६ मध्ये ६३३, २०१७ मध्ये ५९१, २०१८ मध्ये ४ आॅक्टोबरपर्यंत २२८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शिरूर तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ५९९.४ मि.मी. इतकी आहे. यंदा केवळ २२९ मि.मी. पाऊस झाला आहे. 

बळीराजा काय म्हणतो?

मला अवघी दीड एकर जमीन आहे. त्यात घेतलेले पीक शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे कसे होणार हाच विचार भंडावून सोडत आहे. -विठ्ठल विश्वनात राऊत

माझ्याकडे चार एकर शेती आहे. चार मोठी जनावरे, पाच शेळ्या असा प्रपंच. आता मात्र हे सर्व बिºहाड ऊसतोडीसाठी गेल्याशिवाय भागणार नाही. -अभिमान एकनाथ मोरे

मी अशी वेळ कधी पाहिली नव्हती. दुष्काळ पाहिले; परंतु पाण्याचे दुर्भिक्ष अनुभवले नव्हते.-आश्रुबा रावजी राऊत 

आमचे अकरा माणसांचे कुटुंब. पंधरा-सोळा एकर जमिनीत जवळपास सव्वालाख रुपये खर्च केले; परंतु यावर्षी आमच्यावर ऊसतोडीला जाण्याची वेळ आली आहे. -संगीता कृष्णाथ गंडाळ 

यावर्षी दुहेरी फटका बसल्याने हवालदिल झालो आहोत. आता सरकारनेच दिलासा द्यावा.-बापूराव मोरे

रबी हंगाम पावसावरचपाऊस कमी झाल्याने खरीप हंगामात स्थिती बिकट झाली आहे.  रबी हंगाम पावसावरच अवलंबून आहे. फळबागेबाबत शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामानआधारित फळपीक विमा काढून आपली बाग विमा संरक्षित करावी. -भीमराव बांगर, तालुका कृषी अधिकारी, शिरूर कासार

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी