शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दुष्काळी शेतकऱ्यांची पुन्हा चेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:39 IST

दुष्काळी परिस्थिती, शेतक-यांनी शेतीवर केलेल्या खर्चानंतर झालेले नुकसान याचे गणित पाहिले तर जाहीर झालेली मदत अतिशय तोकडी असून थट्टा केल्यासारखी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खरीप पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बीड जिल्ह्यासाठी शासनातर्फे १२६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. दुष्काळी परिस्थिती, शेतक-यांनी शेतीवर केलेल्या खर्चानंतर झालेले नुकसान याचे गणित पाहिले तर जाहीर झालेली मदत अतिशय तोकडी असून थट्टा केल्यासारखी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.दोन टप्प्यात हे अनुदान देण्यात येणार असल्याचे देखील शासन निर्णयात म्हटले आहे. पहिल्या टप्प्यासाठी बीड जिल्ह्याला १२६ कोटींची तरतूद केली आहे. मात्र, खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचा अंदाज जवळपास ७०० कोटींचा आहे. त्यामुळे दुष्काळात होरळणाºया शेतकºयांची शासनाकडून चेष्टा केली जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी अनुदान देण्याची तयारी राज्य सरकारकडून करण्यात आली आली आहे. खरीप पिकासाठी हेक्टरी ६ हजार ८०० तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार इतके अनुदान निश्चित केले आहे. मात्र, हे सर्व अनुदान शेतक-यांना एकरकमी मिळणार नाही. पहिल्या टप्प्यात ५० टक्केच अनुदानाचे वितरण होईल. त्यानुसार खरीप पिकांसाठी पहिला हप्ता हेक्टरी ३ हजार इतकी मदत सरकार करणार आहे. बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ९ हजार रुपये दिले जाणार आहेत. ही मदतही सरसकट नसून, ज्या शेतक-यांच्या सातबारावर पिकाची नोंद आहे त्या पिकाचे नुकसान ६७ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे पीक कापणी प्रयोगातून समोर आले तरच हे अनुदान मिळण्यास शेतकरी पात्र राहणार आहे.बीड जिल्ह्यातील बहुतांश गावांची पैसेवारी ५० पैशाच्या पुढे होती. आता यातील काही गावांमध्ये विशिष्ट पिकांची पैसेवारी जर जास्त आलेली असेल तर अशा शेतक-यांना अनुदानातून वगळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रथम टप्प्यातील मदत पूर्णपणे वाटप झाल्यानंतर ३१ मार्चपूर्वी दुस-या हप्त्याची रक्कम देण्यात येणार असल्याचे अध्यादेशात नमूद आहे.सरसकट मदत देण्याची अजूनही मागणीजिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीपासह रबी हंगाम देखील शेतक-यांच्या हाती लागला नाही.तसेच पेरणी व इतर शेतीच्या कामावर झालेला खर्च मिळणा-या मदतीपेक्षे पाच पट अधिक आहे.दुष्काळाच्या दाहकतेमध्ये होरपळणा-या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सरकट व मोठ्या प्रमाणात मदत देण्याची आवश्यकता असल्याच्या प्रतिक्रिया शेतक-यांनी दिल्या.दोन टप्प्यांत देणार मदतशेतक-यांना दिली जाणारी मदत दोन टप्प्यात देण्यात येणार आहे, ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रथम हप्ता प्रति हेक्टर ६८०० च्या निम्मे ३४०० रुपये तर बहुवार्षिंक पिकांसाठी प्रति.हे. १८ हजाराच्या निम्मे ९ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही मदत फक्त दोन हेक्टर वरील लागवडीसाठीच देण्यात येणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळfundsनिधीFarmerशेतकरी