शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

दुष्काळी शेतकऱ्यांची पुन्हा चेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:39 IST

दुष्काळी परिस्थिती, शेतक-यांनी शेतीवर केलेल्या खर्चानंतर झालेले नुकसान याचे गणित पाहिले तर जाहीर झालेली मदत अतिशय तोकडी असून थट्टा केल्यासारखी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खरीप पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बीड जिल्ह्यासाठी शासनातर्फे १२६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. दुष्काळी परिस्थिती, शेतक-यांनी शेतीवर केलेल्या खर्चानंतर झालेले नुकसान याचे गणित पाहिले तर जाहीर झालेली मदत अतिशय तोकडी असून थट्टा केल्यासारखी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.दोन टप्प्यात हे अनुदान देण्यात येणार असल्याचे देखील शासन निर्णयात म्हटले आहे. पहिल्या टप्प्यासाठी बीड जिल्ह्याला १२६ कोटींची तरतूद केली आहे. मात्र, खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचा अंदाज जवळपास ७०० कोटींचा आहे. त्यामुळे दुष्काळात होरळणाºया शेतकºयांची शासनाकडून चेष्टा केली जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी अनुदान देण्याची तयारी राज्य सरकारकडून करण्यात आली आली आहे. खरीप पिकासाठी हेक्टरी ६ हजार ८०० तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार इतके अनुदान निश्चित केले आहे. मात्र, हे सर्व अनुदान शेतक-यांना एकरकमी मिळणार नाही. पहिल्या टप्प्यात ५० टक्केच अनुदानाचे वितरण होईल. त्यानुसार खरीप पिकांसाठी पहिला हप्ता हेक्टरी ३ हजार इतकी मदत सरकार करणार आहे. बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ९ हजार रुपये दिले जाणार आहेत. ही मदतही सरसकट नसून, ज्या शेतक-यांच्या सातबारावर पिकाची नोंद आहे त्या पिकाचे नुकसान ६७ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे पीक कापणी प्रयोगातून समोर आले तरच हे अनुदान मिळण्यास शेतकरी पात्र राहणार आहे.बीड जिल्ह्यातील बहुतांश गावांची पैसेवारी ५० पैशाच्या पुढे होती. आता यातील काही गावांमध्ये विशिष्ट पिकांची पैसेवारी जर जास्त आलेली असेल तर अशा शेतक-यांना अनुदानातून वगळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रथम टप्प्यातील मदत पूर्णपणे वाटप झाल्यानंतर ३१ मार्चपूर्वी दुस-या हप्त्याची रक्कम देण्यात येणार असल्याचे अध्यादेशात नमूद आहे.सरसकट मदत देण्याची अजूनही मागणीजिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीपासह रबी हंगाम देखील शेतक-यांच्या हाती लागला नाही.तसेच पेरणी व इतर शेतीच्या कामावर झालेला खर्च मिळणा-या मदतीपेक्षे पाच पट अधिक आहे.दुष्काळाच्या दाहकतेमध्ये होरपळणा-या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सरकट व मोठ्या प्रमाणात मदत देण्याची आवश्यकता असल्याच्या प्रतिक्रिया शेतक-यांनी दिल्या.दोन टप्प्यांत देणार मदतशेतक-यांना दिली जाणारी मदत दोन टप्प्यात देण्यात येणार आहे, ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रथम हप्ता प्रति हेक्टर ६८०० च्या निम्मे ३४०० रुपये तर बहुवार्षिंक पिकांसाठी प्रति.हे. १८ हजाराच्या निम्मे ९ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही मदत फक्त दोन हेक्टर वरील लागवडीसाठीच देण्यात येणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळfundsनिधीFarmerशेतकरी