शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

दुष्काळी शेतकऱ्यांची पुन्हा चेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:39 IST

दुष्काळी परिस्थिती, शेतक-यांनी शेतीवर केलेल्या खर्चानंतर झालेले नुकसान याचे गणित पाहिले तर जाहीर झालेली मदत अतिशय तोकडी असून थट्टा केल्यासारखी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खरीप पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बीड जिल्ह्यासाठी शासनातर्फे १२६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. दुष्काळी परिस्थिती, शेतक-यांनी शेतीवर केलेल्या खर्चानंतर झालेले नुकसान याचे गणित पाहिले तर जाहीर झालेली मदत अतिशय तोकडी असून थट्टा केल्यासारखी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.दोन टप्प्यात हे अनुदान देण्यात येणार असल्याचे देखील शासन निर्णयात म्हटले आहे. पहिल्या टप्प्यासाठी बीड जिल्ह्याला १२६ कोटींची तरतूद केली आहे. मात्र, खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचा अंदाज जवळपास ७०० कोटींचा आहे. त्यामुळे दुष्काळात होरळणाºया शेतकºयांची शासनाकडून चेष्टा केली जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी अनुदान देण्याची तयारी राज्य सरकारकडून करण्यात आली आली आहे. खरीप पिकासाठी हेक्टरी ६ हजार ८०० तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार इतके अनुदान निश्चित केले आहे. मात्र, हे सर्व अनुदान शेतक-यांना एकरकमी मिळणार नाही. पहिल्या टप्प्यात ५० टक्केच अनुदानाचे वितरण होईल. त्यानुसार खरीप पिकांसाठी पहिला हप्ता हेक्टरी ३ हजार इतकी मदत सरकार करणार आहे. बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ९ हजार रुपये दिले जाणार आहेत. ही मदतही सरसकट नसून, ज्या शेतक-यांच्या सातबारावर पिकाची नोंद आहे त्या पिकाचे नुकसान ६७ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे पीक कापणी प्रयोगातून समोर आले तरच हे अनुदान मिळण्यास शेतकरी पात्र राहणार आहे.बीड जिल्ह्यातील बहुतांश गावांची पैसेवारी ५० पैशाच्या पुढे होती. आता यातील काही गावांमध्ये विशिष्ट पिकांची पैसेवारी जर जास्त आलेली असेल तर अशा शेतक-यांना अनुदानातून वगळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रथम टप्प्यातील मदत पूर्णपणे वाटप झाल्यानंतर ३१ मार्चपूर्वी दुस-या हप्त्याची रक्कम देण्यात येणार असल्याचे अध्यादेशात नमूद आहे.सरसकट मदत देण्याची अजूनही मागणीजिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीपासह रबी हंगाम देखील शेतक-यांच्या हाती लागला नाही.तसेच पेरणी व इतर शेतीच्या कामावर झालेला खर्च मिळणा-या मदतीपेक्षे पाच पट अधिक आहे.दुष्काळाच्या दाहकतेमध्ये होरपळणा-या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सरकट व मोठ्या प्रमाणात मदत देण्याची आवश्यकता असल्याच्या प्रतिक्रिया शेतक-यांनी दिल्या.दोन टप्प्यांत देणार मदतशेतक-यांना दिली जाणारी मदत दोन टप्प्यात देण्यात येणार आहे, ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रथम हप्ता प्रति हेक्टर ६८०० च्या निम्मे ३४०० रुपये तर बहुवार्षिंक पिकांसाठी प्रति.हे. १८ हजाराच्या निम्मे ९ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही मदत फक्त दोन हेक्टर वरील लागवडीसाठीच देण्यात येणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळfundsनिधीFarmerशेतकरी