शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 5:51 PM

शेतकऱ्यांनी रबी हंगामात पेरणी केलेली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे.

ठळक मुद्देरबी हंगामातील पेरणीच्या तोंडावरच अतिवृष्टीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले.

- प्रभात बुडूख

बीड : जिल्ह्यात रबी हंगामाचे पेरणीलायक क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्टर असून, यापैकी फक्त २२.९५ टक्के क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे दुबार पेरणी करण्याचे संकट आले आहे. 

कापूस या पिकाचे दोन्ही हंगामात उत्पादन घेतले जाते. परंतु, रबी हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये खरीप हंगामातील कापूस, सोयबीन या मुख्य पिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी रबी हंगामातील ज्वारी, गहू, मका, हरभरा या मुख्य पिकांची पेरणी करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात रबी हंगामातील क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्टर आहे. त्यापैकी फक्त ९७ हजार ३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ज्वारीची ८५ हजार ९६८ हेक्टरवर व हरभऱ्याची १० हजार ३९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.  अतिवृष्टीमुळे रबी हंगामातील पेरणीला उशीर झाला असून अजूनही अनेक ठिकाणी वापसा आलेला नसल्यामुळे पेरणी करणे शक्य नाही. नोव्हेंबर अखेरपर्यंत रबी  पेरा पूर्ण होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

पेरणीपुढेच पाऊसरबी हंगामात प्रामुख्याने ज्वारी हे पीक घेतले जाते. यामुळे जनावरांची चारा व धान्य या दोन्हीची गरज भागते. त्यामुळे अनेक शेतकरी रबीसाठी क्षेत्र राखून ठेवतात किंवा सोयाबीन पिकाच्या काढणीनंतर रबी हंगामातील पेरणी त्या क्षेत्रावर करतात. दरम्यान, रबी हंगामातील पेरणीच्या तोंडावरच अतिवृष्टीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले. यावेळी शेतकऱ्यांनी रबी हंगामात पेरणी केलेली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे.  

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस