शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

सत्ता असूनही पालकमंत्र्यांना परळीत उद्योग आणता आला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:34 AM

परळी मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता असतानाही साधा एखादा उद्योग आणणे तर लांबच वारसा हक्काने मिळालेला साखर कारखानाही चालवता येत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता केली.

ठळक मुद्देधनंजय मुंडे यांनी डागली तोफ : परळीत राष्ट्रवादीचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : परळी मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता असतानाही साधा एखादा उद्योग आणणे तर लांबच वारसा हक्काने मिळालेला साखर कारखानाही चालवता येत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता केली.१ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या मेळाव्याच्या तयारीसाठी तालुकानिहाय सुरू असलेल्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर येथील हालगे गार्डनमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्या वेळी मुंडे बोलत होते.२०१२ मध्ये शून्यात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज परळी विधानसभा मतदार संघाचा बालेकिल्ला झाला आहे. ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत आपण सर्व निवडणुका जिंकल्या. आता पक्ष नेतृत्वाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची वेळ आली आहे. परळी विधानसभा मतदार संघात परिवर्तन करण्याची ताकद आहे. आपल्याला बीड जिल्ह्यातील सहाही जागा जिंकायच्या आहेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. बीडच्या मेळाव्यात सर्वाधिक संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन मुंडे यांनी या मेळाव्यात केले.वैद्यनाथ ज्योतिर्लिंग नाव केंद्र शासनाच्या रेल्वे आणि पर्यटन विभागातून वगळून परळीचा आणि साक्षात वैद्यनाथाचा अपमान केल्याबद्दल संताप व्यक्त करून एकवेळ विकास नाही झाला तरी चालेल, मात्र शहराचा आणि भगवंतांचा अपमान कदापिही सहन करणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला. युवकांची मोठी शक्ती मेळाव्यात दिसेल, असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जयसिंग सोळंके यांनी व्यक्त केला. यावेळी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख यांचेही भाषण झाले.कार्यक्रमास बाळासाहेब आजबे, आप्पा राख, बाळासाहेब देशमुख, राजेश्वर चव्हाण, कृ.उ.बा. सभापती गोविंदराव फड, रणजित लोमटे, चंदूलाल बियाणी, डॉ. संतोष मुंडे, व पदाधिकारी उपस्थित होते.प्रास्ताविक बाजीराव धर्माधिकारी, सूत्रसंचालन गोविंद केंद्रे तर आभार प्रदर्शन प्रा. मधुकर आघाव यांनी केले. कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.निर्णायक लढाईचा लढा बीडच्या मेळाव्यातून उभारणार४केंद्र आणि राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. महागाई वाढली, शेत मालाचे भाव पडले, अच्छे दिनच्या केवळ थापा मारणारे हे थापाडे सरकार असून, ते आपल्याला घालवायचे आहे. त्यासाठीच निर्णायक लढाईचा लढा बीडच्या मेळाव्यातून उभा केला जाणार आहे. त्यामुळे या मेळाव्यास संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केले.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस