लेखी आश्वासनानंतर वंचितचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST2021-05-31T04:25:11+5:302021-05-31T04:25:11+5:30
गेवराईचे तहसीलदार तथा दंडाधिकाऱ्यांनी २८ मे रोजी लेखी पत्राद्वारे मौजे सुरळेगाव, पंचाळेश्वर, राक्षसभुवन शनिचे, नागझरी वाळूघाटातून अनधिकृत वाळूचे ...

लेखी आश्वासनानंतर वंचितचे आंदोलन मागे
गेवराईचे तहसीलदार तथा दंडाधिकाऱ्यांनी २८ मे रोजी लेखी पत्राद्वारे मौजे सुरळेगाव, पंचाळेश्वर, राक्षसभुवन शनिचे, नागझरी वाळूघाटातून अनधिकृत वाळूचे उत्खनन व वाहतूक होऊ नये याची खबरदारी घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातील नमूद अटी-शर्तींचे काटेकोर पालन करण्याबात संबंधित लिलावधारकास सूचना देण्यात आल्या आहेत. लिलावधारकांकडून अटी व शर्तींच्या पालनाची तपासणी करण्यासाठी नायब तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली मंडळ अधिकारी व तलाठी यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले. उत्खननाचे मोजमाप करण्यासाठी ईटीएस मशीनद्वारे मोजणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. वाळूघाटाची ईटीएस मशीनद्वारे मोजणी करून टेंडरधारकांना ठरवून दिलेल्या परिणामापेक्षा (ब्रास व क्षेत्र) जास्तीचे उत्खनन केले असल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलन तूर्त स्थगित केल्याचे तालुकाध्यक्ष पप्पू गायकवाड, किशोर भोले, ज्ञानेश्वर हवाले, शरद खापरे यांनी सांगितले.