माझ्या भगिनींनी रेल्वेतून बीडला येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला का ? -धनंजय मुंडेबीड : माझ्या भगिनींनी रेल्वेतून बीडला येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला का, असा उपरोधिक सवाल करीत मागच्या निवडणुकीत भाजपाने दिलेल्या आश्वासनाची विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी खिल्ली उडवत आठवून करून दिली.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे बीड लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीतच गांधीगिरी दाखवत धनंजय मुंडे यांनी आपले भाषण चालत असतानाच केले. सभेस परवानगी नाकारली म्हणून त्यांनी ही गांधीगिरी केली. तळपणारा सूर्य डोक्यावर आहे. आमच्या आम्हाला तापवत आहे, सत्तांध नेतृत्वाला पराभवाच्या सागरात घातल्याशिवाय हा जनता रु पी बजरंग गप्प बसणार नाही ! असे म्हणत त्यांनी रॅलीमध्ये चालत असतानाच भाषण केले. सत्तेचा दुरुपयोग होत आहे. आपला आवाज कोणीच दाबू शकत नसल्याचे सांगत तुम्ही फक्त सभा नाकारू शकता, जनतेचा आवाज नाही, असे त्यांनी मुंडे भगिनींना ठणकावले देखील. रॅलीतील भाषणात आणि सकाळी झालेल्या पत्रपरिषदेत धनंजय मुंडे यांनी अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाचा उल्लेख केला. रेल्वेचे आश्वासन मतदारांना दिले होते. कुठे आहे रेल्वे? केवळ पोकळ आश्वासने भाजपाने दिलीत, असे त्यांनी सांगितले.
नमनालाच आरोप-प्रत्यारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:49 IST
माझ्या भगिनींनी रेल्वेतून बीडला येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला का ? - धनंजय मुंडे बीड : माझ्या भगिनींनी रेल्वेतून ...
नमनालाच आरोप-प्रत्यारोप
ठळक मुद्देबीड लोकसभा निवडणूक : अर्ज भरल्यानंतर बहीण-भावातच रंगली जुगलबंदी; प्रशासनावरही आरोपमाझ्या भगिनींनी रेल्वेतून बीडला येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला का ? -धनंजय मुंडे‘रेल्वेने उमेदवारी अर्ज भरायला येणार’ असे मी म्हणाले नव्हते- प्रीतम मुंडे